मुंबईची खबर : पायाभूत प्रकल्पांसाठी मुंबईतील किती झाडांवर चालणार कुऱ्हाड?

मुंबई तक

• 03:06 PM • 29 Jul 2026

मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्पांसाठी अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. याविषयी वृक्ष प्राधिकरणाने 11 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर

point

पायाभूत प्रकल्पांसाठी मुंबईतील किती झाडांवर चालणार कुऱ्हाड?

Mumbai News : मुंबईतील विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) वृक्ष प्राधिकरणाने मंगळवारी (28 जुलै) महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शहराभरातील 1,457 झाडे तोडण्याच्या आणि 1,297 झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प, पवई आणि घाटकोपर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, अदानी इलेक्ट्रिसिटीचे सबस्टेशन तसेच आयआयटी परिसरातील निवासी इमारतींच्या बांधकामासारख्या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

11 प्रस्तावांना मंजुरी

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत एकूण 11 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर चार प्रस्ताव अधिक माहितीसाठी आणि प्रभावित होणाऱ्या झाडांची संख्या कमी करता येईल का, हे तपासण्यासाठी मागे पाठवण्यात आले. सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथील जुने आणि नवे मंडला दरम्यानचा रस्ता, कंबाला हिल व ब्रिच कँडी येथील पुनर्विकास प्रकल्पासाठीचे उत्खनन व रस्ताकाम, आणि मालाड येथील आगामी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वसाहतीशी संबंधित चार प्रस्तावांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : महिला शिक्षिकेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, नवऱ्याला संपवण्याची धमकी

मंजुरी आधीच वृक्षतोड सुरु

दरम्यान, मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी धरावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका हर्षला मोरे यांनी आरोप केला की, वृक्ष प्राधिकरणाची अधिकृत मंजुरी मिळण्यापूर्वीच या भागात झाडे तोडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासोबतच, या झाडांच्या बदल्यात केली जाणारी भरपाई वृक्षारोपण योग्य ठिकाणी होत आहे का, हे तपासण्यासाठी प्राधिकरणाच्या सदस्यांची प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली.

हे ही वाचा : सहावीतील विद्यार्थिनीला रिकाम्या वर्गात न्यायचा अन्..., 50 वर्षीय शिक्षक निलंबित

प्रस्तावांची फेरतपासणी

नगरसेविका मोरे यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची पालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेतली आहे. शहराचा विकास साधतानाच पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि शक्य तितक्या कमी प्रमाणात वृक्षतोड व्हावी, या दृष्टीने प्रशासन उर्वरित स्थगित प्रस्तावांची फेरतपासणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.