Lok Sabha 2024 : "शपथेला नाही, खंजिराला महत्त्व", शरद पवारांचा बावनकुळेंनी काढला इतिहास

योगेश पांडे

25 Apr 2024 (अपडेटेड: 25 Apr 2024, 12:23 PM)

Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर भाजपची टीका. चंद्रशेखर बावनकुळे पवारांबद्दल काय बोलले?

महाराष्ट्र भाजपची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका.

शरद पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे.

follow google news

Sharad Pawar ChandraShekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शपथनामा असे नाव दिले आहे. याच नावावर बोट ठेवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना डिवचलं आहे. पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेपेक्षा खंजिराला महत्त्व आहे, असे बावनकुळे म्हणालेत. (BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Sharad Pawar Over NCP Manifesto)

हे वाचलं का?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, "शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?", खोचक सवाल बावनकुळेंनी केला.

हेही वाचा >> 500 रुपयांत गॅस सिलिंडर; पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा 

पुढे ते म्हणतात, "महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे", अशी टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे. 

इतकंच नाही, तर बावनकुळेंनी शरद पवारांच्या राजकीय जीवनातील काही घटनांचाही उल्लेख केला आहे. त्या अशा...

"१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले."

"१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले."

"१९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले."

"१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले."

"१९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली."

"२०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!"

"२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली."

हेही वाचा >> ...म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने विशाल पाटलांवर केली नाही कारवाई

इतिहासातील या राजकीय घटनांचा उल्लेख करत बावनकुळेंनी शेवटी म्हटलं आहे की, "खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?"

शपथनामा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) जाहीरनाम्यावर भाजपने टीका केली आहे. त्यामुळे याला आता शरद पवारांकडून काय उत्तर दिले जाईल, हे पाहावं लागेल. 

    follow whatsapp