Lok Sabha 2024 : 500 रुपयांत गॅस सिलिंडर; पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या आहेत?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
social share
google news

NCP SharadChandra Pawar Party Manifesto Released : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शपथनामा असं जाहीरनाम्याला म्हटलं असून, त्यात पक्षाची लोकसभेत काय भूमिका असेल, याबद्दल काही घोषणा केल्या आहेत. (Nationalist Congress party Sharadchandra Pawar Manifesto)

पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात काय?

- गेल्या दहा वर्षात मतदारांची फसवणूक झालेली आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर, नोटाबंदी, खासगीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. या सगळ्यांवर आम्ही शपथपत्रात भूमिका मांडलेली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला 'डीएमके' फॅक्टरची चिंता! कुठे बसू शकतो फटका? 

-समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करू. ५०० रुपयांच्या दरम्यान निश्चित करू. त्यासाठी गरज वाटली, तर केंद्र सरकार त्याला अनुदान देईल. जसं पूर्वी युपीएच्या राजवटीत होत होतं, असे पाटील म्हणाले.

 

ADVERTISEMENT

-पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. देशातील महागाई वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. त्याला मर्यादीत करणार.

ADVERTISEMENT

-देशातील शासकीय रिक्त जागा सत्तेत आल्यानंतर भरू. महिलांना शासकीय नोकऱ्यात ५० टक्के आरक्षण देण्याची भूमिका. 

-करासंदर्भातील केंद्राचा हस्तक्षेप मर्यादित करू. 

-स्पर्धा परीक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करू. 

-महिला आणि मुलींसाठी शिक्षणातील अडथळे दूर करू. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे आणू.

हेही वाचा >> कुठे उमेदवार बदलले, कुठे माघार घेतली.. 'वंचित'वर का आली अशी वेळ? 

-महिलांना संसदेत आणि विधिमंडळात तातडीने आरक्षण देण्याचा प्रयत्न करू. 

-शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत दर देऊ, त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू. 

-जातीनिहाय जनगणना करू. आरक्षणाची ५० टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू.

-खासगी महाविद्यालयात आरक्षण देण्याचे काम करणार.

-आरोग्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूद ४ टक्क्यापर्यंत नेऊ.

हेही वाचा >> "शिंदेंच्या डोक्यात भुजबळांना उमेदवारी द्यायचं होतं", कोल्हेंचा स्फोटक दावा 

-शिक्षणासाठी अर्थसंकल्पात ६ टक्क्यांची तरतूद करू. 

- प्रत्येक गरीब महिलेला १ लाख रुपये देऊ. 

-अंगणवाडी सेविकांची संख्या वाढवू. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT