Mahayuti Lok Sabha Seats : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात 'या' 16 जागा?

Mahayuti Lok Sabha Seats Allocation : महाराष्ट्रातील ४८ पैकी १६ जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

Ajit Pawar's NCP want 16 seats of lok sabha in mahayuti

अजित पवारांचा १६ लोकसभा मतदारसंघावर दावा.

भागवत हिरेकर

05 Mar 2024 (अपडेटेड: 05 Mar 2024, 08:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांचं कसं होणार वाटप?

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात १६ जागा

point

भाजप कसा काढणार तोडगा?

Mahayuti seats allocation for lok sabha election 2024 : लोकसभा जागावाटपावरून महायुतीमध्ये राजकीय घमासान बघायला मिळत आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या मतदारसंघांवर दावे करताना दिसत आहे. त्यामुळे जागावाटप करण्याचे मोठे आव्हान महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा मागितल्या आहेत. यात काही भाजपकडे तर काही शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ आहेत. (Ajit Pawar's NCP has claimed 16 Lok Sabha constituencies.)

हे वाचलं का?

भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे २२ आणि १६ जागांची मागणी केली आहे. या जागांसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे दिसत असून, अंतिम निर्णयानंतर कुणाला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला हवे असलेले मतदारसंघ

गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहेत.

शिंदेंच्या शिवसेनाला कोणत्या जागा हव्यात?

रामटेक, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई , ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, धाराशिव (उस्मानाबाद), कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. 

हेही वाचा >> कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून कसं मिळालं तिकीट? वाचा Inside Story

भाजप ३३ जागा लढवणार?

राज्यात भाजप अधिकाधिक जागा लढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. ३७० खासदार जिंकून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने भाजप प्रयत्न करत आहे. 

इतर राज्यांप्रमाणेच भाजप महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा लढवू शकते. इतर दोन मित्र पक्षांना विधानसभेला झुकतं माप द्यायचं आणि लोकसभेला जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या अशा भूमिकेत भाजप असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा >> '10-10 वेळा निरोप, लपून-छपून भेटी...', अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

भाजपची सुरुवातीपासूनच सर्वच लोकसभा मतदारसंघात तयारी असून, ३३ जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून होत आहे.

    follow whatsapp