'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात..' बायकोची महिला आयोगाकडे तक्रार

Crime News : राष्ट्रीय महिला आयोगाच्या जनसुनावणीत एका महिलेने आपल्याच घरात सुरु असलेल्या भयानक प्रकाराचा खुलासा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासमोर आलेल्या या तक्रारीने नात्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

13 Mar 2026 (अपडेटेड: 13 Mar 2026, 11:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात'

point

बायकोची महिला आयोगाकडे तक्रार

Crime News : राष्ट्रीय महिला आयोगाच्या जनसुनावणीत एका महिलेने आपल्याच घरात सुरु असलेल्या भयानक प्रकाराचा खुलासा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासमोर आलेल्या या तक्रारीने नात्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

जबरदस्तीने रुममध्ये बसवले जाते

एका पीडित महिलेने तिचा पती स्वतःच्या सख्ख्या बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे तर, हे कृत्य सुरु असताना तिला जबरदस्तीने त्याच रुममध्ये थांबायला लावले जात असल्याचेही तिने नमूद केले. मध्यप्रदेशची  राजधानी भोपाळमध्ये सुरु असलेल्या महिला आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान हा प्रकार समोर आला.

पोलिस कारवाईला का घाबरतात?

पीडितेने प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, तिने या प्रकरणाबाबत पोलीस आणि सासरच्या मंडळींकडे वारंवार मदतीची याचना केली, मात्र कोणीही तिला साथ दिली नाही. उलट पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यासही नकार दिला. तक्रार नोंदवायला पोलिस का घाबरतात हे मला समजत नसल्याचंही पीडितेने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : वहिणीसोबतच्या अफेअरला आईचा विरोध, धाकट्या मुलाने 'असा' दूर केला अडथळा; नेमकं काय घडलं?

विजया रहाटकर काय म्हणाल्या? 

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले की, ज्या महिला दिल्लीतील मुख्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आयोग स्वतः विविध राज्यांमध्ये जाऊन जनसुनावणी घेत आहे. महिलांच्या सुरक्षा आणि न्यायाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत अनेक कौटुंबिक वादांवर घटनास्थळीच तोडगा काढण्यात आला. जनसुनावणीत आलेल्या या तक्रारींनी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
 

    follow whatsapp