आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?

काँग्रेस पक्ष सतत विचारमंथन करत आहे, वाईट काळावर मात करण्यासाठी चिंतन शिबिरे आयोजित करत आहे. या वर्षाच्या अखेरीस ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांकडे काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. या सगळ्यात पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक सुकाणू […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:28 PM • 21 Aug 2022

follow google news

काँग्रेस पक्ष सतत विचारमंथन करत आहे, वाईट काळावर मात करण्यासाठी चिंतन शिबिरे आयोजित करत आहे. या वर्षाच्या अखेरीस ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांकडे काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. या सगळ्यात पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

हे वाचलं का?

आनंद शर्मा यांनी का दिला राजीनामा?

आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश निवडणूक सुकाणू समितीच्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. सोनिया गांधींकडे राजीनामा पाठवल्यानंतर आनंद शर्मा यांनी एकामागून एक दोन ट्विट केले आहेत. आनंद शर्मा यांनी जड अंतःकरणाने हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस सुकाणू समितीचे अध्यक्षपद सोडल्याचे ट्विट केले आहे.

सतत बहिष्कार आणि स्वाभिमानी असल्यामुळे होणारा अपमान पाहता माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही, असेही आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मी आयुष्यभर काँग्रेसचा आहे आणि मी या विश्वासावर ठाम आहे. काँग्रेसची विचारधारा माझ्या रक्तात आहे आणि त्याबद्दल शंका नसावी, असेही आनंद शर्मा यांनी ट्विट करून म्हटले आहे.

आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे सततचा अपमान आणि बहिष्कार हेच कारण सांगितले आहे. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्यातही त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केल्याचे बोलले जात आहे. आनंद शर्मा यांनी आपल्या राजीनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्यात बैठकांना बोलावले जात नाही.

गुलाम नबी आझाद यांचा देखील राजीनामा

हिमाचल प्रदेशातील बलाढ्य नेत्यांमध्ये गणले जाणारे आनंद शर्मा यांच्या आधी जम्मू-काश्मीरचे दिग्गज गुलाम नबी आझाद यांचीही जम्मू-काश्मीर निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. गुलाम नबी आझाद यांनी निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काही तासांनी राजीनामा दिला होता.

आनंद शर्मा हे काँग्रेसच्या G-23 गटाचे नेते देखील आहेत. या गटापासून ते सीडब्ल्यूसीपर्यंतचे नेते पक्षातील अंतर्गत लोकशाहीसाठी निवडणुका घेण्याचे समर्थक आहेत. G-23 चे नेते पक्षात एकप्रकारे दुर्लक्षाला बळी पडले आहेत.

    follow whatsapp