देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असतानाच रविवारी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी भाजपविरोधात पर्याय देण्याबद्दल भाष्य केलं. दरम्यान, केसीआर आणि पवार-ठाकरे यांच्यातील भेटीबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
“तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून, भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेसशिवाय भाजपविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही”, असं नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.
…तर त्यांना भोगावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांचा भाजपला इशारा
“केंद्रातील भाजप सरकार हुकुमशाही वृत्तीनं वागत आहे. संविधान, लोकशाही संपवण्याचं आणि देशाची मालमत्ता विकण्याचं काम सुरु आहे. भाजप विरोधकांसोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्यानं ते पक्ष आता भाजपपासून दुरावले आहेत.”
शरद पवार आणि केसीआर यांच्यात तब्बल दीड तास चर्चा, बैठकीनंतर पवार म्हणाले..
“के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे केंद्रातील भाजप सरकारविरोधी भूमिका घेऊन भाजपविरोधात आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशा आघाडीसाठी विविध राज्यात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण पुढे यासंदर्भात काही ठोस घडलं नाही. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल अशीच भूमिका घेतली होती, पण आता भाजपबद्दलचे त्यांचे विचार बदलले आहेत,” असा अप्रत्यक्षपणे पटोले यांनी टोला लगावला.
“भाजप हा लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणेच विविध राजकीय पक्ष आणि देशातील सर्वसामान्य जनतेला भाजपचा खरा चेहरा लक्षात आला असून, देशातील जनता भाजपला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हीच भाजपविरोधात सक्षम पर्याय असून काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपला पर्याय होऊ शकत नाही”, अशी भूमिका पटोलेंनी मांडली.
ADVERTISEMENT
