दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी ‘हे’ आहेत नियम,लस निवडीचा पर्याय आहे?

मुंबई तक

• 08:29 AM • 25 Feb 2021

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येतेय. भारतातही फ्रंटलाईन वर्कर्ससोबतच आता १ मार्चपासून लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाची घोषणा केली. यावेळी दुसऱ्या टप्प्यातली लसीकरण […]

Mumbaitak
follow google news

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना साथीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येतेय. भारतातही फ्रंटलाईन वर्कर्ससोबतच आता १ मार्चपासून लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे.

हे वाचलं का?

केंद्र सरकारनं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाची घोषणा केली. यावेळी दुसऱ्या टप्प्यातली लसीकरण मोहिमेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्यामुळे तुमच्या मनातही दुसऱ्या टप्प्यातल्या या लसीकरण मोहिमेत आपण स्वतःला कसं सामील होऊ शकतो, त्यासाठी कोणते नियम आणि अटी आहेत, असा प्रश्न पडला असेल. तुमच्या मनातल्या याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटांत मिळणार आहे.

कोणत्या वयोगटातल्या लोकांना मिळणार लस?

दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी सरकारने वयोगट निश्चित केलाय. त्यानुसार ६० वर्षाहून अधिक वय असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. तसंच ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तिंचाही यामध्ये समावेश आहे.

खासगी दवाखान्यात लसीची किंमत किती?

दुसऱ्या टप्प्यात खासगी दवाखान्यांनाही लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी देण्यात आलीय. सरकारी केंद्रांवर लस मोफत मिळेल. तर खासगी केंद्रांवर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. सरकारनं अजून यासाठीचे दर निश्चित केले नाहीत. येत्या काही दिवसांतच सरकारकडून हे दर जाहीर केले जातील.

लसीकरणासाठी कोणती कागदपत्रं लागतील?

आता पुढचा प्रश्न येतो, वयाच्या अटीमुळे लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील. तर सरकारनं ४५ वर्षांहून अधिक आणि ६० हून कमी या वयोगटातल्या फक्त गंभीर आजार असलेल्या लोकांनाच लस दिली जाणार आहे. पण गंभीर आजारापण सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील, का हे अजून सरकारनं स्पष्ट केलं नाही.

कोविन ऐपचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, ‘गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना त्यांच्या आराजासंबंधीची कागदपत्रं सादर करवण्यास सरकारने सांगितलं, तर ती सादर करावी लागतील. म्हणजेच तुम्ही ज्या डॉक्टरकडून औषधोपचार, सल्ला घेताय, त्यांचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. आणि सरकारने सूचना केल्यावर आपल्या आजारासंबंधीची हीच माहिती कोविन ऐपवर भरावी लागेल.’

लस निवडण्याचा पर्याय असेल का?

भारतात दोन लसींना वापरासाठी परवानगी मिळालीय. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. दुसऱ्या टप्प्यातसुद्धा या दोन लसीच वापरासाठी उपलब्ध आहेत. पण यापैकी कोणती लस घ्यायची किंवा नाकारायची हा पर्याय उपलब्ध नाही. आणि सरकारनेही याबद्दल कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही.

लस घेतल्याचं प्रमाणपत्र कधी मिळणार?

सध्या लस घेतल्यानंतर लगेच संबंधित व्यक्तिला एक प्रमाणपत्र दिलं जातंय. पण दुसऱ्या टप्प्यात लगेचच असं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. लसीचा डोस दिल्यानंतर केंद्र सरकार प्रमाणपत्र प्रसिद्ध करेल आणि त्यानंतर ते संबंधिताला म्हणजेच लाभार्थ्याला दिलं जाईल. ऐपवरूनच हे लाभार्थ्याला डाऊनलोड करता येईल. म्हणजेच हे प्रमाणपत्र लाभार्थ्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा परदेश प्रवासाला जाताना दाखवता येईल.

    follow whatsapp