सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचं सूचक विधान

मुंबई तक

• 11:36 AM • 02 Feb 2022

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. १ हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. कोरोनामधून सावरल्यानंतर बारामतीत पत्रकारांशी बोलत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. १ हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

हे वाचलं का?

कोरोनामधून सावरल्यानंतर बारामतीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला तर माझी काही हरकत नसेल असं विधान केलं आहे.

माझ्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्नच नाही. आज देशात अनेक ठिकाणी सरकारची परवानगी घेऊन ही गोष्ट विकली जाते, त्याची दुकानं असतात. त्यात वाईनही असतेच. आता फक्त मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे ही चर्चा सुरु आहे. त्याला फार विरोध होत असेल आणि तो निर्णय आता थांबवला तरीही काही फरक पडत नाही, असं शरद पवार म्हणाले.

…तर मी स्वतः औरंगाबादची दुकानं फोडेन ! वाईन विक्रीच्या निर्णयाला इम्तियाज जलील यांचं आव्हान

इतर प्रकारची दारु आणि वाईन यांच्यातला फरक समजावून घेण्याची भूमिका असली पाहिजे. पण जर तशी भूमिका नसेल आणि त्याला विरोध होत असेल तर सरकारने आपला निर्णय मागे घेतला तरीही माझी काही हरकत नसेल, असं सूचक विधान पवारांनी केलं आहे.

मुळात हा विषय फार चिंताजनक आहे असं मला वाटत नाही. परंतू ज्या राजकारणांना असं वाटत असेल तर त्यावर राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तरीही त्यात फार काही वावगं राहणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं. द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचंही यावेळी शरद पवारांनी समर्थन केलं. आज नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पिकवली जातात. नाशिकमध्ये आताच्या घडीला ५-६ वायनरी आहेत. या वायनरी आज नाही तर गेल्या २० वर्षांपासून आहेत.

शाळेत खिचडीऐवजी वाईन द्या अन् मंदिरातही व्यवस्था करा; बंडातात्या कराडकरांचे सरकारला टोले

त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होत असेल आणि तशी मागणी होत असेल म्हणूनच या वायनरी आज तिकडे असल्याचं शरद पवार म्हणाले.

    follow whatsapp