परमबीर सिंग यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता, निवृत्त एसीपींनी केला खळबळजनक आरोप

मुंबई तक

• 09:39 AM • 25 Nov 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देशाबाहेर पळाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने कोर्टातही तशी माहिती दिली होती. अशात परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला आणि आपण चंदीगढमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. परमबीर सिंग कुठे आहेत हे इतक्या महिन्यांनी 24 नोव्हेंबरला समजलं आहे. अशातच त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक […]

Mumbaitak
follow google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देशाबाहेर पळाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने कोर्टातही तशी माहिती दिली होती. अशात परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला आणि आपण चंदीगढमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. परमबीर सिंग कुठे आहेत हे इतक्या महिन्यांनी 24 नोव्हेंबरला समजलं आहे. अशातच त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा हा आरोप आहे. यासंदर्भातलं एक पत्रच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पाठवलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे शमशेर पठाण यांनी?

26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमिर कसाबचा मोबाईल परमबीर सिंग यांनी लपवल्याचा आणि दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप शमशेर पठाण यांनी केला. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी पत्रात केला आहे.

26/11 चा दहशतवादी याला कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी अंगावार गोळ्या झेलत आणि आपले प्राण पणाला लावून पकडलं. कसाबच्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे शहीद झाले. मात्र कसाबला जिवंत पकडण्यात यश आलं होतं. आता याच कसाबला परमबीर सिंग यांनी मदत केल्याचा आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे. गिरगाव चौपाटीच्या सिग्नलवर कसाबला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर परमबीर सिंगही तिथे आले होते. त्यावेळी त्यांनी कसाबचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी तो तपास अधिकारी असलेल्या रमेश महाले यांना देणं अपेक्षित होतं. पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कुणा भारतीयाचा हात आहे का? हे देखील समजलं असतं असंही आपल्या तक्रारीत शमशेर यांनी म्हटलं आहे.

Video : ‘फरार’ परमबीर सिंग 231 दिवसांनी मुंबईत आल्यावर काय म्हणाले?

परमबीर सिंग आज तब्बल 231 दिवसांनी मुंबईत परतले आहेत. चांदीवाल कमिशन समोर हजर राहण्यासाठी ते गेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यासंदर्भातलं एक पत्र त्यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. हे प्रकरण हायकोर्टात गेलं त्यावेळी कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ज्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आता परमबीर सिंग काय सांगणार, आपल्यावरच्या आरोपांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp