Raj Thackeray म्हणतात Lockdown आवडे सरकारला!

मुंबई तक

• 08:39 AM • 29 Jul 2021

सध्याच्या काळात महाराष्ट्रात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध आहेत. त्याबाबत आज राज ठाकरेंना विचारण्यात आलं तेव्हा लॉकडाऊन आवडे सरकारला असं यांचं धोरण आहे. कारण हे लॉकडाऊन करणार आणि त्यांना कोणी विचारायचं नाही. पी साईनाथ यांचं पुस्तक आहे की दुष्काळ आवडे सर्वांना तसं लॉकडाऊन आवडे सरकारला असं या सरकारचं धोरण आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पुण्यात झालेल्या […]

Mumbaitak
follow google news

सध्याच्या काळात महाराष्ट्रात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध आहेत. त्याबाबत आज राज ठाकरेंना विचारण्यात आलं तेव्हा लॉकडाऊन आवडे सरकारला असं यांचं धोरण आहे. कारण हे लॉकडाऊन करणार आणि त्यांना कोणी विचारायचं नाही. पी साईनाथ यांचं पुस्तक आहे की दुष्काळ आवडे सर्वांना तसं लॉकडाऊन आवडे सरकारला असं या सरकारचं धोरण आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.

हे वाचलं का?

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही प्रमाणात लॉकडाऊनवरून टीका होते आहे. त्याबद्दल विचारलं असता, महाराष्ट्रातच निर्बंध का? दोन लसी घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्या असं पत्र मी आधीच सरकारला दिलं होतं. आता ते विचार करत आहेत. लॉकडाऊन करून यांना काय फरक पडतो? लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. घर कसं चालवायचं हा प्रश्न लोकांपुढे आहे. अशात लोकांचा विचार हे सरकार का करत नाही? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. पी. साईनाथ यांचं पुस्तक आहे दुष्काळ आवडे सरकारला तसं या सरकारचं धोरण आहे. तिसरी लाट येणार आहे त्यामुळे घाबरून घरात बसायचं याला काय अर्थ आहे असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या टार्गेटवर कोण आहे असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की जो टारगट असेल त्याच्यावर माझं टार्गेट असेल.

पूरपरिस्थिीबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. आपल्याकडे ढिसाळ नियोजन आहे. महाड, चिपळूण या ठिकाणी दरवर्षी पाणी साठतं. मात्र नियोजनचा आपल्याकडे पत्ताच नाही. सरकार फक्त विकासाचे आराखडे आणतं पण शहरांच्या नियोजनाचे प्रश्न तसेच आहेत. आपल्याकडे नद्या तुंबल्या आहेत त्यावर अतिक्रमणं झाली आहे त्यावर सरकारने काय केलं? त्यामुळे पाऊस झाला तर तुंबणारच आहे. मुंबईत तर दहा बारा जागा अशा आहेत की तीस चाळीस लोक एकत्र येऊन मुतले तरी पाणी तुंबतं याला काय नियोजन म्हणायचं का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

परप्रांतीयांबाबतची माझी भूमिका स्पष्ट आणि महाराष्ट्र हिताची आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांना हेही विचारण्यात आलं की फडणवीस म्हणत आहेत की परप्रांतीयाबाबत काही भूमिका स्पष्ट केली राज ठाकरेंनी तर युतीचा विचार करू. या प्रश्नावर आता राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

मी आजपर्यंत भाषणात परप्रांतीयांबाबत मांडलेल्या मांडलेल्या भूमिका या स्पष्ट आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. बैल मुतत जातो तशा मी भूमिका बदलत नाही. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही हे सरळ आहे. तुम्ही आता आसाम आणि मिझोरमचा प्रश्न पाहिला तर तिथेही हेच चाललं आहे. मूळ असे प्रश्न निर्माण का होतात याची चर्चा होणं आवश्यक आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा सरळ विरोध मी केला आहे. ज्या भूमिका घेतल्या, ज्या पटल्या त्याचं मी समर्थनही केलं आहे. यात काही चुकीचं नाही. मला छक्के पंजे करायला आवडत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp