RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला

मुंबई तक

07 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:55 PM)

Rahul Gandhi statement on RSS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला लक्ष्य केलं. लंडनमधील थिंक टँक चैथम हाऊसमध्ये बोलताना राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी केली. या कार्यक्रमात गांधींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना आरएसएस कट्टरपंथी आणि फॅसिस्टवादी संघटना असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजपनेही टीका केली आहे. […]

Mumbaitak
follow google news

Rahul Gandhi statement on RSS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला लक्ष्य केलं. लंडनमधील थिंक टँक चैथम हाऊसमध्ये बोलताना राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी केली. या कार्यक्रमात गांधींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना आरएसएस कट्टरपंथी आणि फॅसिस्टवादी संघटना असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजपनेही टीका केली आहे. (RSS is Fascist Organization says Rahul Gandhi)

हे वाचलं का?

चैथम हाऊस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भारतात लोकशाही प्रतिस्पर्धेचं स्वरुप पूर्णपणे बदलून टाकण्यात आलं आहे. याच कारण आहे आरएसएस नावाची एक संघटना. एक कट्टरपंथी, फॅसिस्टवादी संघटना. या संघटनेनं भारतातील जवळपास सर्वच संस्थांवर कब्जा मिळवला आहे.”

राहुल गांधी पुढे असं म्हणाले की, “आरएसएस मुस्लिम ब्रदरहूडप्रमाणेच तयार करण्यात आली आहे. या संघटनेचा विचार असा आहे की, सत्तेत येण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करायचा आणि सत्तेत आल्यानंतर लोकशाही प्रतिस्पर्धा पूर्णपणे संपवून टाकायची.”

राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा

भारतातील लोकशाही कोसळली तर मोठा झटका असेल -राहुल गांधी

“भारतातील लोकशाही ही जागतिक स्तरावरील एक चांगली गोष्ट आहे. भारत खूप मोठा आहे. जर भारतात लोकशाही कुमकूवत केली गेली, तर त्याचा परिणाम पूर्ण जगावर होईल. भारतातील लोकशाही अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत तीन पटीने मोठी आहे आणि तिच लोकशाही कोसळली तर पूर्ण ग्रहासाठी एक झटका असेल,” असं राहुल गांधी या कार्यक्रमात म्हणाले.

काँग्रेसच्या अपयशाबद्दल राहुल गांधी काय बोलले?

काँग्रेसप्रणित युपीएच्या अपयशाबद्दलही राहुल गांधींनी या कार्यक्रमात भाष्य केलं. “स्वातंत्र्यापासून आतापर्यंत बघितलं तर काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत राहिली आहे. भाजप 10 वर्षे सत्तेत असण्यापूर्वी आम्ही 10 वर्ष सत्तेत होतो. भाजपला वाटतं की ते सत्तेत आहेत आणि नेहमीच राहतील, पण असं नाहीये”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आम्ही ग्रामीण क्षेत्रांवर जास्त लक्ष्य केंद्रीत करत होतो. जे शहरात करण्याचं आम्ही राहून गेलो. पण असं म्हणणं की, भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेस दूर गेली, हे वास्तविकपणे हास्यास्पद विचार आहे. माध्यमे, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग सर्वच धोक्यात आहे आणि हर एक प्रकारे नियंत्रित केले जात आहेत”, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर

भाजप भडकली! राहुल गांधींना अनुराग ठाकूर यांचं प्रत्युत्तर

राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर केलेल्या टीकेला अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं. ठाकूर म्हणाले, “राहुल गांधींनी देशासोबत विश्वासघात करू नये. परदेशात तुम्ही भारताबद्दल पसरवलेल्या खोट्या गोष्टींवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. राहुल गांधी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी परदेशात जाऊन भारताला बदनाम करत आहेत. राहुल गांधी भारताला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीये”, अशी टीका अनुराग कश्यप यांनी केली.

    follow whatsapp