संगीतकार कौशल इनामदार सांगतोय मराठी अभिमान गीताची जन्मकथा

गेली ११ वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावं असं हे गाणं आजही तितक्याच उत्साहात आणि जोमात अख्ख्या जगभर गाजतंय. सुरेश भटांनी लिहीलेल्या या अजरामर ओळी शब्दबध्द करण्याचं कसब केलं ते गायक,संगीतकार कौशल इनामदारने. मात्र हे गाणं काही सहजासहजी झालं नव्हतं, यामागे एक मोठी कहाणी आहे. अनेक अडीअडचणींना पार करत कौशलने अख्ख्य़ा महाराष्ट्राला हेवा वाटावं असं […]

मुंबई तक

27 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

गेली ११ वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावं असं हे गाणं आजही तितक्याच उत्साहात आणि जोमात अख्ख्या जगभर गाजतंय. सुरेश भटांनी लिहीलेल्या या अजरामर ओळी शब्दबध्द करण्याचं कसब केलं ते गायक,संगीतकार कौशल इनामदारने. मात्र हे गाणं काही सहजासहजी झालं नव्हतं, यामागे एक मोठी कहाणी आहे. अनेक अडीअडचणींना पार करत कौशलने अख्ख्य़ा महाराष्ट्राला हेवा वाटावं असं हे अभिमान गीत पूर्णत्वास आणलं. ह्याची जन्मकथाही तितकीच रोमांचक आणि अनोखी आहे. कौशलला हे मराठी अभिमान गीत का करावंसं वाटलं? ते करत असताना त्याला कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागलं? आणि मुळात हे गाणं दीड वर्षांनी पूर्ण झालं तेव्हा आलेला अनुभव हा ही तितकाच प्रफुल्लित करणारा आहे. या अनुभवाबद्दल मुंबई तकच्या प्रेक्षकांना आपला अनुभव सांगतोय या गाण्याचा जन्मदाता संगीतकार कौशल इनामदार

    follow whatsapp