Sunil Tatkare: सगळे खासदार बाहेर गेले, पण सुनील तटकरे लोकसभेत एकटेच का बसले?

रोहित गोळे

• 05:10 PM • 10 Aug 2023

लोकसभेत अविश्वास प्रस्ताववर पंतप्रधान मोदी भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. पण एकटे सुनील तटकरे हे मात्र विरोधी बाकांवर बसून राहिले. जाणून घ्या त्यांनी नेमकं असं का केलं?

opposition mps walked out of the house only sunil tatkare remained sitting on opposition benches while pm modi was speaking on no confidence motion in lok sabha

opposition mps walked out of the house only sunil tatkare remained sitting on opposition benches while pm modi was speaking on no confidence motion in lok sabha

follow google news

Sunil Tatkare Lok Sabha: नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. ज्यामध्ये चर्चेच्या शेवटी आज (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. तब्बल 2 तास 13 मिनिटं हे भाषण सुरू होतं. ज्यामध्ये मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पण प्रामुख्याने त्यांनी काँग्रेसवर टीका केली. पण त्यांच्या भाषणाच्या अर्ध्यावरच विरोधकांनी सभात्याग केला. पण याचवेळी विरोधी बाकांवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) मात्र बसूनच राहिले. (opposition mps walked out of the house only sunil tatkare remained sitting on opposition benches while pm modi was speaking on no confidence motion in lok sabha)

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदींनी तब्बल 2 तासाहून अधिक वेळ भाषण केलं. पण भाषणातील पहिले दीड तास ते मणिपूर हिंसाचारावर एकही शब्द बोलले. त्यामुळे बराच वेळ गदारोळ देखील घातला. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी सुनिल तटकरे हे एकटेच बसलेले दिसून आले.

तटकरे सभागृहात का बसून राहिले?

2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बंड केलं आणि त्यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये अजित पवारांसोबत खासदार सुनील तटकरे हे देखील गेले. मात्र, असं असलं तरीही लोकसभेत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं अधिकृतरित्या नोंद झालेली नाही. त्यामुळे अद्याप तरी लोकसभेत राष्ट्रवादी हा एकच गट आहे. जो विरोधी बाकांवर बसतोय.. तिथेच सुनील तटकरे यांना बसावं लागत आहे.

मात्र, असं असलं तरीही तटकरे हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात भूमिका घेणं काही त्यांना शक्य नाही. त्यामुळेच जेव्हा पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला तेव्हा संपूर्ण विरोधी बाकं खाली झालेली असताना एकटे सुनील तटकरे हे बसून राहिले. मोदींचं संपूर्ण भाषण होईपर्यंत ते तिथेच बसले होते.

अन् पंतप्रधान मोदी मणिपूरवर बोलले…

मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यांनी आरोप केला की, ‘मोदी मणिपूरवर बोलत नाहीत.’ आणि ते लोकसभेतून निघून गेले. यानंतर मोदींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.. ते म्हणाले की, ‘ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते बोलायला तर तयार आहेत पण ऐकायला मात्र अजिबात तयार नाहीत. ते खोटे बोलून पळून जातात.’

यानंतर मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘याबाबत जर विरोधकांनी गृहमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असती तर फक्त मणिपूरवर दीर्घ चर्चा होऊ शकली असती. पण त्यांना फक्त याबाबत राजकारण करायचं होतं.’ असं मोदी म्हणाले.

अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्ष हे सर्व विषयांवर बोलले. त्यामुळे आमचं देखील कर्तव्य आहे की, देशाचा आमच्यावर असलेल्या विश्वास प्रकट करण्यासाठी आम्हाला देखील सर्व मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे.

मोदी पुढे म्हणाले की, गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केले आहे. मात्र विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही.

मणिपूरमध्ये न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर तिथे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आणि हिंसाचार सुरू झाला. अनेकांनी आपले जवळचे प्रियजन गमावले, महिलांवर अत्याचार झाले. पण दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाने विश्वास ठेवावा, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. असं म्हणत मोदींनी मणिपूर विषयावर भाष्य केलं.

    follow whatsapp