Political news of Maharashtra: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सत्तेला आता 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्याच गोष्टीवरून शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका करण्यात आली आहे. ‘मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे!’ अशा शब्दात सामनातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (shiv sena ubt editorial of saamana once again heavily criticized prime minister modi maharashtra politics news)
ADVERTISEMENT
‘मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळ्या गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या दृष्टीने ‘मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी’अशी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
