Uddhav Thackeray : ‘सच्चा समाजसेवकापुढे तुम्हाला झुकावचं लागलं…’ ठाकरेंचा शाहंना टोला

योगेश पांडे

16 Apr 2023 (अपडेटेड: 16 Apr 2023, 05:45 PM)

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली

(Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur on aappasaheb dharmadhikari

(Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur on aappasaheb dharmadhikari

follow google news

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही एक आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला तर, जे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोंबलत आहेत. पण त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घरण्यासमोर झुकावं लागलं. त्यांच्याकडे काही सत्ता नाही, अधिकार नाही. पण सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक असला, तर झुकावंच लागेल. हे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना टोला लगावला. (Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur)

हे वाचलं का?

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Karnataka : भाजपचं जहाज बुडणार? माजी मुख्यमंत्र्यांनी दिला सर्वात मोठा झटका

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, धर्माधिकारी घराणं मोठं आहे, या घराण्याची एक परंपरा आहे. ते व्यसनमुक्तीचेही काम करतात. दारू आणि अंमली पदार्थाचे व्यसन वाईट असते. तशीच सत्तेची नशा सुद्धा असते. दारूचे व्यसन एक घर उद्ध्वस्त करते. तर सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करते, हे आपण भोगत आहोत.

शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु असताना शिंदे अयोध्या दौऱ्यावर :

यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही जोरदार टीका केली.  हे अवकाळी आणि उलट्या पायाचं सरकार आलं, सतत गारपीट होत आहे. हवालदिल शेतकरी ओरडत आहेत, शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे अयोध्येला देवदर्शनाला गेले. जा, पण हे राम राज्य महाराष्ट्रात कधी येणार? इकडे सरकारी अधिकारी पंचनाम्याला वेळेवर जात नाहीत, नंतर मुख्यमंत्री जातात अन् आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. आम्ही सरकारमध्ये असताना वेळेत मदत पोहचत होती. आता शेतकरी काय बोलतात तर पंचनामे नका करू आमच्या मयताला या. हे निर्लज्ज आहेत, हे तिकडेही जातील.

’16 आमदार अपात्र झाले, तर…’, अजित पवारांनी केली बेरीज अन् सांगितला बहुमताचा आकडा

फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका :

आम्ही सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेले, गुवाहटीला गेले. यांच्या धमन्यांमध्ये खरंच हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते. बरं, यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्रीही गेले. पण फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का? केवळ तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, हे दाखविण्यासाठीच हे अयोध्येला गेले, असा टोला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या सततचे दौरे ठाकरेंच्या निशाण्यावर :

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दौऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोरोना काळात मी घरातून काम केलं. त्यावर विरोधक टीका करत असतात. हो, मी घरातून काम केलं. मी घरातून काम केलं तरी लोकांच्या सहकार्याने आपण कोरोनाचा मुकाबला केला आणि देशात पहिल्या पाच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नंबर होता. काम करायची इच्छा असेल तर कुठूनही करता येते. फक्त वणवण फिरले म्हणजे खूप काम केलं असं नसतं, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला.

“महादेवराव महाडिक, तुम्ही नाही तर 42 हजार मतांनी आमदार केलं…” सतेज पाटील

चंद्रकांतदादा, तुम्ही आणि तुमचे काका गेले होते का?

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेनाप्रमुख नव्हते म्हणता, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती, तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता, त्यांचं योगदान तुम्ही नाकारता? माझं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनाही विचारणा आहे की, तुम्हाला हे चंद्रकांत पाटलांचे म्हणणं पटतं का?

    follow whatsapp