परीकथेतील ‘राज’कुमारा!

मुंबई तक

तो डोळ्यांची भाषा जाणत होता, त्याच्या डोळ्यांनीच तो बोलायचा. तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा. बरोबर.. राज कपूर. राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांना जाऊन 33 वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचं पडद्यावरचं असणं आपण, आपल्या पिढ्या आणि पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. तो काळ OTT, APP यांचा नव्हता. […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

तो डोळ्यांची भाषा जाणत होता, त्याच्या डोळ्यांनीच तो बोलायचा. तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा. बरोबर.. राज कपूर. राज कपूर यांची आज जयंती. राज कपूर यांना जाऊन 33 वर्षे झाली आहेत. तरीही त्यांचं पडद्यावरचं असणं आपण, आपल्या पिढ्या आणि पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. तो काळ OTT, APP यांचा नव्हता. तो काळ मल्टिप्लेक्स आणि नव्या तंत्रज्ञानाचाही नव्हता. तो काळ होता सिंगल स्क्रिन थिएटर्सचा. त्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आणि त्यांच्या मनावर राज्य करणारा राजा होता राज कपूर.

दादासाहेब फाळकेंना सिनेसृष्टीचे जनक असं संबोधलं जातं. मूकपट असोत किंवा त्यानंतर बोलपट ते आणण्यात आणि मनोरंजनाचं नवं कवाड उघडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यात काही शंकाच नाही. त्यांच्या इतकंच महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे राज कपूर यांचं. राज कपूर यांनी विविध प्रकारचे सिनेमा देऊन मनोरंजन विश्वात आपलं नाव कायमचं कोरून ठेवलं आहे. हिंदी सिनेसृष्टी ही राज कपूर यांच्या नावाशिवाय अधुरी आहे.

राज कपूर यांनी 1948 मध्ये आग या सिनेमातून त्यांनी त्यांचं दिग्दर्शीय पदार्पण केलं. तर त्याआधी 1947 ला आलेला नील कमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. ते हयात असेपर्यंत हिंदी सिनेसृष्टीचं बॉलिवूड असं नामकरण झालेलं नव्हतं. त्या काळात नंबर वन, नंबर टू अशा स्पर्धाही नव्हत्या. दिलीप कुमार, देवआनंद, राज कपूर ही त्रयी 50, 60 आणि 70 चं दशक गाजवणारी ठरली. बाकी त्यांच्यावेळी जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, राजेंद्र कुमार असे हिरोही होतेच. पण सगळ्यांना भुरळ पडली होती ती या त्रयीची. राज कपूर यांनी अभिनय करत असतानाच दिग्दर्शक म्हणूनही ते काम करत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp