‘त्यांच्याही गोष्टी बाजारात येतील’; IT ची छापेमारी संपताच अभिजित पाटलांचा इशारा

मुंबई तक

-गणेश जाधव, उस्मानाबाद धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयासह कारखान्यातील आयकर विभागाची झाडाझडती तीन दिवसानंतर संपली. अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील घर, कारखाना आणि उस्मानाबाद येथील कारखान्यावर ३ दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर आता अभिजित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय. आयकर विभागाच्या कारवाईवर अभिजित पाटील काय म्हणाले? आयकर विभागाची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

-गणेश जाधव, उस्मानाबाद

धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयासह कारखान्यातील आयकर विभागाची झाडाझडती तीन दिवसानंतर संपली. अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील घर, कारखाना आणि उस्मानाबाद येथील कारखान्यावर ३ दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर आता अभिजित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय.

आयकर विभागाच्या कारवाईवर अभिजित पाटील काय म्हणाले?

आयकर विभागाची छापेमारी संपल्यानंतर आज अभिजित पाटील यांनी मौन सोडलं. “आयकर विभागाला चुकीची माहिती दिली गेली. कारखाने कुठून एका मागून एक आले? इतका पैसा कुठून आला?, असं विचारलं गेलं. त्यावर आम्ही सांगितलं की, काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत. त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोनं किंवा इतर मालमत्ता सापडली नाही. त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यात ती दिली जातील”, अशी माहिती अभिजित पाटील यांनी आयटीच्या छापेमारीनंतर दिली.

आयकरची कारवाई हे विरोधकांचं षडयंत्र -अभिजित पाटील

“मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढावली. त्यात मला यश आलं. त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे, यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले”, असा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे.