दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात ‘शिमगा’; राज ठाकरेंच्या मनसेनंही घेतली उडी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि मनसेमध्ये शिमगा होण्याची चिन्ह दिसताहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल, असं शिवसेनेकडून ठामपणे सांगितलं जातंय. दुसरीकडे शिंदे गटही मेळाव्या घेण्याची शक्यता असून, आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) उडी घेतलीये. ‘वारसा हा वास्तूचा नसतो, […]
ADVERTISEMENT

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि मनसेमध्ये शिमगा होण्याची चिन्ह दिसताहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल, असं शिवसेनेकडून ठामपणे सांगितलं जातंय. दुसरीकडे शिंदे गटही मेळाव्या घेण्याची शक्यता असून, आता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) उडी घेतलीये.
‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’, या राज ठाकरेंनी अलिकडेच केलेल्या विधानाचा उल्लेख करत मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट केलं. संदीप देशपांडे यांच्या याच ट्विटमुळे शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या संघर्षात मनसेही उडी मारणार ही चर्चा सुरू झालीये.
शिवसेना दसरा मेळावा 2022 : संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केलं. त्यात संदीप देशपांडे म्हणतात, “शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटणं!आजच्याघडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो.”
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
राज ठाकरेंना मनसे पदाधिकारी करणार विनंती
बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक राज ठाकरे यांना विनंती करणार आहोत की, दसऱ्याच्या दिवशी देशातील आणि महाराष्ट्रातील जनता त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी संबोधित करावं, असंही संदीप देशपांडे म्हणाले.