‘…तर तुमचे पंचप्राण कंठाशी येतील’; ‘घराणेशाही’वरून शिवसेनेचे थेट नरेंद्र मोदींना उलट सवाल

मुंबई तक

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन मुद्द्यांचाही उल्लेख केला. यातील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता थेट नरेंद्र मोदींवरच पलटवार केलाय. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदींना काही उलटसवालही केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. विशेषतः पंतप्रधान मोदींनी उपस्थित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन मुद्द्यांचाही उल्लेख केला. यातील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता थेट नरेंद्र मोदींवरच पलटवार केलाय. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदींना काही उलटसवालही केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. विशेषतः पंतप्रधान मोदींनी उपस्थित केलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं पंतप्रधान मोदींनाच काही प्रश्न विचारले आहेत.

नरेंद्र मोदींच्या लालकिल्ल्यावरील भाषणावर शिवसेनेनं काय म्हटलंय?

शिवसेनेनं म्हटलं आहे की, “पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार व घराणेशाहीवर घणाघात केला, पण गेली नऊ वर्षे आपलेच राज्य आहे! आपण आपल्या उद्योजक मित्रपरिवाराचे 10 लाख कोटींचे बँक कर्ज माफ केले. यास नक्की काय म्हणावे? इकडे तुमचे ‘ईडी-पिडी’ राजकीय विरोधकांना चवली-पावलीच्या व्यवहारांत पकडून तुरुंगात डांबत आहेत. मग हे कर्जमाफीचे काय प्रकरण आहे?”, असा सवाल शिवसेनेनं मोदींना केला आहे.

Aditya Thackeray: खरे मुख्यमंत्री कोण? तेच कळत नाही.. तुम्हीच सांगा म्हणत उडवली खिल्ली

हे वाचलं का?

    follow whatsapp