Durgadi Fort वर मशीद नाही मंदिरच, 48 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल.. वक्फची मागणीही फेटाळली!
Kalyan Durgadi Fort: कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याशी संबंधित निकाल कोर्टाने दिला आहे. तब्बल 48 वर्ष सुरू असलेल्या या खटल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल हा कोर्टाने दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद?, कोर्टाचा मोठा निर्णय
अखेर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
गेल्या 48 वर्षांपासून न्यायालयामध्ये सुरु होता वाद
कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज (10 डिसेंबर) सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद? यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. (court ruled that there is a temple at durgadi fort also rejected the demand for waqf case had been going on for 48 years)
मागील 48 वर्षपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. अखेर या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत. यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत केला जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
जाणून घ्या या खटल्याचा संपूर्ण इतिहास
◆ कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे, हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला. हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धर्मियांचा दावा न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते आणि हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना दुर्गाडी किल्ला येथे दिली.
हे ही वाचा>> Waqf Board : "वक्फ बोर्डाचा देशातील 994 मालमत्तांवर बेकायदेशीर...", संसदेत दिलेल्या उत्तरातून आकडेवाडीर समोर
◆ मागील 48 वर्षापासून दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद हा दोन धर्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होता. त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता, असे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले. या दाव्यासंदर्भात माहिती देताना याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले, १९७१ मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर याठिकाणी मंदिर की मशीद असा एक चौकशी अर्ज दाखल करण्यात आला होता. या दाव्यात हिंदू समाजातर्फे ॲड. भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली होती. मशिदीला खिडक्या नसतात. याठिकाणी मंदिराला खिडक्या आहेत. याठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी देवालय (चौथरा) आहे. त्यामुळे ही वास्तू मंदिर आहे, असे तेव्हा शासनाने जाहीर केले होते.










