सहा मुलांच्या बापाने होणाऱ्या सुनेलाच पळवलं! सासऱ्याचा कांड सर्वांसमोर उघडकीस आला अन् नंतर जे घडलं..
Shocking Love Story Viral : उत्तरप्रदेशच्या अलिगढनंतर आता रामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सासऱ्याने त्याच्याच मुलाच्या होणाऱ्या पत्नीसोबत लग्न केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासऱ्याने सुनेला पळवून नेल्यावर काय घडलं?

मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Shocking Love Story Viral : उत्तरप्रदेशच्या अलिगढनंतर आता रामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सासऱ्याने त्याच्याच मुलाच्या होणाऱ्या पत्नीसोबत लग्न केलं. या घटनेमुळं संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. बासनगली गावात राहणारा शकील, जो सहा मुलांचा बाप आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाचं लग्न एका मुलीसोबत ठरवलं. पण नंतर त्याच मुलीला पळवून नेत त्याने तिच्यासोबत लग्न केलं. शकीलच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर शकील आणि होणारी सोन सतत फोनवर बोलायचे. त्यानंतर ते व्हिडीओ कॉलवरही बोलू लागले.
कसं सुरु झालं प्रेमप्रकरण?
शकीलने त्याच्या अल्पवयीन मुलाचं लग्न खोमपूर गावातील एक मुलीसोबत ठरवलं. कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला होता. पण शकीलने त्याची पत्नी आणि मुलांना मारहाण करून जबरदस्ती लग्नाला तयार केलं. शकीलच्या पत्नीने म्हटलं की, तो सतत दबाव आणि घरगुती हिंसाचाराचा बळी पडला आहे.
हे ही वाचा >> Video: महाबळेश्वर, साताऱ्यात तुफान पाऊस, वेण्णा लेक ओव्हरफ्लो.. ही दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी!
दिवसभर कॉल, रात्री व्हिडीओ कॉल
शकीलच्या पत्नीने म्हटलंय, लग्न ठरल्यानंतर शकील आणि होणारी सून फोनवर बोलायचे. दिवसभर नॉर्मल कॉल आणि रात्री व्हिडीओ कॉलवर बोलायचे. जेव्हा कुटुंबातील लोकांनी विरोध केला, तेव्हा शकीलने शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. शकीलच्या पत्नीने म्हटलं की, तिने दोघांनाही अनेकदा संशयित परिस्थितीत पाहिलं. जेव्हा त्याच्या मुलाला याबाबत कळलं, तेव्हा शकील त्याच्यावर भडकला.
हे ही वाचा >> दोन मुलांची आई चटावलेली अनैतिक संबंधाला, तरुण मुलाच्या नादात बसली नको ते करून...
मुलाने लग्नाला दिला नकार..
जेव्हा एका मुलाने या लग्नाला नकार दिला, तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली. मुलाने सांगितलं की, त्याने त्याचे वडिल आणि होणाऱ्या पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये ठेवले आहेत. त्याने स्पष्ट म्हटलं की, तो अल्पवयीन आहे, त्याच्यासाठी हे लग्न ठीक नाही. त्यानंतर शकीलने एक दिवस 2 लाख रुपयांची रोकड आणि दीड तोळा सोनं घेऊन सुनेसोबत पळून गेला.