कोकणासह रायगड रत्नागिरीसह 'या' पावसाचा जोर कायम, पुणे आणि साताऱ्यात येलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने राज्यात 22 जानेवारी रोजी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान खात्याने भागानुसार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

22 जानेवारी रोजी पावसाचा अंदाज

point

थोडक्यात माहिती घ्या जाणून

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने राज्यात 22 जानेवारी रोजी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान खात्याने भागानुसार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. 

हेही वाचा : मध्यरात्री प्यायला बसले अन् अचानक मित्रांमध्ये वाद अन् थेट दगडाने...

कोकण 

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत 22 जानेवारी रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावरील परिसरात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत. पुणे आणि साताऱ्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि कोल्हापूरात काही भागांमध्ये पाऊस आहे. कोकण आणि घाट माथ्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असणार आहे. तर ढगाळ वातावरण असेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. 

मराठवाडा

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये मध्यम ते हलका पाऊस हजेरी लावेल. तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहिल. 

विदर्भ

तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियात पावसाचे प्रमाण थोड्या अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भात जसे की, अमरावती, यवतमाळ येथे काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. 

हेही वाचा : महिलेचा बेडरुममध्ये रंगला होता रोमान्स, अचानक पती आला अन् नको तेच...

हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

दरम्यान, पावसाची परिस्थिती लक्षात घेता हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घ्या. नदी-नाल्यांपासून दूर रहावे. 

शेतकऱ्यांसाठी पूरणीपूर्वी स्थानिक हवामान केंद्रांशी संपर्क साधून पावसाचा अंदाजाची खात्री करून घ्यावी. 

मुसळधार पावसाने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम निर्माण होऊ शकतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp