अहिल्यानगर : शेतजमीन विकण्यास वडिलांचा विरोध, बायको अन् मेहुण्याच्या मदतीने मुलानेच केली हत्या; तपासात मेहुण्याचा वेगळाच कांड उघड

मुंबई तक

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव (ता. कर्जत) येथील एका 60 वर्षीय वृद्धाचा आणि अकोला जिल्ह्यातील एका तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याच्या दोन धक्कादायक घटना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत. शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून बापू आनंदा गाढवे (वय 60) यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ADVERTISEMENT

Ahilyanagar Crime
Ahilyanagar Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेतजमीन विकण्यास विरोध केल्याने वडिलांना संपवले

point

बायको अन् मेहुण्याच्या मदतीने काढला काटा

point

तपासात मेहुण्याचे 'वेगळेच' कांड उघड

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव (ता. कर्जत) येथील एका 60 वर्षीय वृद्धाचा आणि अकोला जिल्ह्यातील एका तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याच्या दोन धक्कादायक घटना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत. शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून बापू आनंदा गाढवे (वय 60) यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जावई सुनील रामदास राठोड आणि मुलगा आकाश बापू गाढवे यांना अटक केली असून, त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.

हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश

तक्रार दाखल करणाऱ्या मुलानेच केला खून

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे याने आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता आकाश गाढवे याच्यावरच संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मृताचा जावई सुनील राठोड आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी सुनील राठोड हा शेगाव येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाला, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

शेतजमीन विकण्याला विरोध केल्याने हत्या

आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, बापू गाढवे हे आपली शेतजमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुलगा आकाश, सून पायल ऊर्फ आकांक्षा आणि जावई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बापू गाढवे यांचे तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp