Govt Job: बँकेत क्लर्क पदावर नोकरीची स्वप्नं पाहताय? मग 'ही' संधी सोडू नका... करा आत्ताच अप्लाय
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून लिपिक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
IBPS कडून नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर
सरकारी बँकेत क्लर्क पदासाठी 10277 उमेदवारांची नियुक्ती
Govt Job: बँकेत सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून लिपिक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. तसेच, या भरतीअंतर्गत रिक्त पदांसाठी एकूण 10277 योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयामध्ये पदवीची डिग्री प्राप्त करणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराचं किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: कोयता-सत्तुरने हल्ला! व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारला अन् मित्राची बोटंच छाटली... बीडमधील धक्कादायक प्रकार
अर्ज करण्यासाठी शुल्क
बँकेत क्लर्क पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवार आणि अपंग उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येतील. यामधील पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि क्वांटिटेव्ह अॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित 200 गुणांसाठी 150 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात येईल.










