मध्यरात्री 4 मुलांच्या आईसोबत रोमान्स करायला गेला अन्...
झारखंडमध्ये 4 मुलांच्या आईसोबत रोमान्स करणं तरुणाला महागात पडल्याचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. दोघे रोमान्स करत असताना गावातील लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना मोठी शिक्षा दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मध्यरात्री 4 मुलांच्या आईसोबत रोमान्स...

प्रियकराला पडलं महागात

नेमकं काय घडलं?
Jharkhand News: झारखंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. 4 मुलांच्या आईसोबत रोमान्स करणं तरुणाला महागात पडलं. तो तरुण मध्यरात्री लग्न झालेल्या आपल्या प्रेयसीसोबत रोमान्स करण्यासाठी तिच्याकडे गेला होता. दोघे रोमान्स करत असताना गावातील लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना मोठी शिक्षा दिली. त्यांना अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आधी त्या दोघांना गावकऱ्यांनी दोरीने बांधून ठेवलं, जेणेकरुन ते पळून जाणार नाहीत. त्यानंतर दोघांना गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. तरुणाला तर त्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारलं. या सगळ्या प्रकरणावर पंचायत बैठक घेण्यात आली आणि बैठकीत तरुणाकडून 3 लाखांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोरी पोलिस स्टेशन परिसरातील बास्को गावात ही घटना घडली. दरम्यान, कोणीतरी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही वाचवले. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिलेली नाही. सोमवारी रात्री उशिरा गावकऱ्यांनी एका विवाहित महिलेला एका तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही महिला 30 वर्षांची असून तिला 4 मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, ही महिला आदिवासी समुदायाची असल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा: लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला म्हणालेली जवळ येऊ नकोस, नाहीतर... आता भलत्याच मुलाची एन्ट्री!
3 लाखांचा दंड
या प्रकरणातील तरुणाची ओळख उमेश सिंह अशी असून तो 22 वर्षांचा आहे. जवळील वनगांवा गावाचा रहिवासी असलेला हा तरुण टॅम्पो ड्रायव्हर म्हणून काम करतो. गावकऱ्यांच्या मते, दोघांनाही गावात आक्षेपार्ह स्थितीत पकल्यानंतर गावाच्या प्रमुखाकडे त्यांना नेण्यात आलं. त्यानंतर जवळपास 10 तास त्या दोघांना दोरीने बांधून ठेवण्यात आलं. गावकऱ्यांनी पंचायत बैठक बोलावली आणि त्यात तरुणाला 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: हसन मुश्रीफांना दिलासा, 'त्या' प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार? कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर...
महिलेच्या पतीला आधीपासून संशय
महिलेच्या पतीने सांगितल्याप्रमाणे, महिला आणि त्या तरुणामध्ये अवैध संबंध असल्याचा पतीला आधीच संशय होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही गावकऱ्यांपासून सोडवले आणि पोलिस स्टेशनमध्ये नेले. एसडीपीओ किशोर तिर्की यांच्या मते, आतापर्यंत कोणत्याही पक्षाने पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केलेला नाही. पोलीस त्यांच्या परीने या घटनेचा तपास करत आहेत.