बायकोचे दोन दिरांसोबत संबंध, नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष मिसळल्याचा आरोप

मुंबई तक

Crime News : विवाहानंतर सात महिन्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पत्नीने जेवणात विष मिसळून मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. पत्नीचे दोन दिरांसोबत संबंध होते. त्यांच्याच सांगण्यावरून पतीला विष देण्यात आल्याचा पतीने धक्कादायक आरोप केला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीचे दोन दिरांसोबत अनैतिक प्रेमसंबंध 

point

नवऱ्याच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळला

Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात विवाहानंतर सात महिन्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पत्नीने जेवणात विष मिसळून मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. पत्नीचे दोन दिरांसोबत संबंध होते. त्यांच्याच सांगण्यावरून पतीला विष देण्यात आल्याचा पती संगम कुमार (वय 28) याने धक्कादायक आरोप केला. पीडिते नवऱ्याने दावा केला की, पत्नीचे 2 दिरांसोबत अनैतिक संबंध होते. पोलीस अधीक्षकांनुसार 21 दिवसानंतर तीन लोकांविरोधात हत्येच्या प्रयत्न केला. इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. 

हे ही वाचा : ऑगस्ट महिन्यात महागोचरची निर्मिती, 'या' राशींचे नशीब उजळेल

पत्नीचे दोन दिरांसोबत अनैतिक प्रेमसंबंध 

पोलिसांनुसार, संगम कुमारचा विवाह हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी कानपुर शिराजपुर ठाणे क्षेत्रातील एका गावातील तरुणीशी झाला होता. संगमने आरोप केला की, लग्नापूर्वी त्याच्या पत्नीचे दिर मनोज कुमार आणि उमा शंकरसोबत अवैध प्रेमसंबंध होते. त्यांचं म्हणणं असं की, अनेकदा पत्नीला समजावण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र तिच्या वागण्यात कसलाही बदल झालेला दिसून आला नाही. पीडित नवऱ्याचा असा आरोप होता की, दिराबाबत ती कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास तयारच नव्हती. 

नवऱ्याच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळला

संगम कुमारच्या माहितीनुसार, 7 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता पत्नीने जेवण केलं आणि त्याच विषारी पदार्थ मिसळला. त्यानंतर पतीची तब्येत बिघडू लागली होती. याचदरम्यान, मनोज कुमार आणि उमाशंकर देखील तिथेच पोहोचला होता. पीडितेनं आरोप केला की, दोघांनी मिळून पतीला मारहाण केली, नंतर पत्नीला आपल्यासोबत घेऊन गेले. तेव्हा कुटुंबीयांनी संगमला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अद्यापही उपचार सुरूच ठेवण्यात आलाय. 

हे ही वाचा : कोल्हापूर : माजी सरपंच महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, शेवटी गोठ्यात केला मर्डर

पीडितेचा आरोप असा की, स्थानिक बिलग्राम कोतवाली पत्नी आणि इतर दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. एसपीच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलिसांनी आरोपी पत्नी, मनोज कुमार आणि उमाशंकरविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.