मुंबई : 13 वर्षे महिलेसोबत शरीरसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून 3 वेळा गर्भपात, मॅनेजरनं कांड करूनही...

मुंबई तक

Mumbai News : मुंबई सत्र न्यायालयाने एका विवाहित कॉर्पोरेट मॅनेजरला 30 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय. आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी 13 वर्षे नातेसंबंध ठेवले आणि नंतर तिचा तीन वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीकडून महिला तीन वेळा गर्भवती

point

नेमकं प्रकरण काय? 

Mumbai News : मुंबई सत्र न्यायालयाने एका विवाहित कॉर्पोरेट मॅनेजरला 30 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय. आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी 13 वर्षे नातेसंबंध ठेवले आणि नंतर तिचा तीन वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं की, हे नातेसंबंध हे दोघांच्याही संमतीने झाले होते. महिला ही सुशिक्षित होती, तिला आरोपीच्या विवाहित असण्यासह त्याची इतर संपूर्ण परिस्थितीची जाणीव देखील होती. न्यायालयाने म्हटलं की, आरोपीने तिच्याशी विवाह न केल्याने महिलेनं रागाच्या भरातच एफआरआय दाखल केला होता.

हे ही वाचा : तरुणाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला पाठवले अश्लील फोटो, आरोपीवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

नेमकं प्रकरण काय? 

न्यायाधीश एस. एस. आडकरांनी सांगितलं की, जेव्हा संबंध सुरु झाले होते तेव्हा त्या महिलेचं वय हे सुमारे 30 वर्षे होते. ती एक प्रौढ महिला होती आणि तिच्यासोबत सुरु असलेल्या सर्व गोष्टींची तिला जाणीव देखील झाली होती, त्यामुळे महिलेची फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही. न्यायाधीशांनी असेही स्पष्ट केले की, जर तिला खोटी माहिती दिली असती तर, तिने तिला ताबडतोब पोलीसात तक्रार करायला हवी होती, पण तिने तक्रार दाखल केली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच काही निर्णयांचा दाखला देताना न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला की, लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली आणि फसवणूक सिद्ध करण्यासाठी कसलीही जबरदस्ती करणे गरजेचं नाही. याच प्रकरणात न्यायाधीश पुढे म्हणाले की, वरील बाब लक्षात घेता, या प्रकरणातील दोघांचे शरीरसंबंध संमतीचेच होते. पीडितेला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती, दिशाभूल किंवा चुकीची माहिती देण्यात आली नव्हती. तिने जे काही केलं ते तिने स्वत:च्या मर्जीनेच केलं आहे.

माटुंगा पोलीस ठाण्यात 2014 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरने या प्रकरणाची सुरुवात झाली. महिलेच्या तक्रारीनुसार, ही घटना 2000 ते 2013 दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात सरकारी वकिलांनी असा युक्तीवाद केला की, आरोपी ज्या कंपनीत काम करत होती, तिथेच आरोपी हा मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आरोपीने आजारी असल्याचे भासवून महिलेला त्याच्या घरी नेले आणि नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. नंतर त्याने आपलं महिलेवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. त्याने लग्नाचं देखील आश्वासन दिलं आणि तिच्यावर लैंगिक शोषण केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp