15 तोळे सोनं, स्कोडा आणि चांदीची भांडी आणि वैष्णवीसारखाच छळ... पुण्यात पुन्हा तोच प्रकार
ऐश्वर्या आणि आदित्य हुलावळे यांचं लग्न 2017-18 मध्ये झालं होतं. मात्र, अवघ्या दहा महिन्यांतच त्यांचा संसार मोडकळीस आला. ऐश्वर्याने सांगितलं की, पती आदित्य यांचे गैरप्रकार तिला समजल्यानंतर त्यांच्याकडून तिचा सतत छळ होत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वैष्णवीसारखाच ऐश्वर्याचाही हुंड्यासाठी छळ

हुंड्यामध्ये दिली कार, सोनं, चांदी....

पतीचं अफेअर कळलं, सासरच्यांचा पत्नीलाच त्रास
Pune : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली होती. वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं कुटुंबाच्या तक्रारीतून दिसून आलंय. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली असतानाच, आता हगवणेंच्या शेजारच्या हिंजवडी गावात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ऐश्वर्या आदित्य हुलावळे ही तरुणी गेल्या सात वर्षांपासून सासरच्या छळामुळे माहेरी राहतेय. तिचाही न्यायासाठी लढा सुरू आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ऐश्वर्याच्या प्रकरणानेही या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं आहे.
हे ही वाचा >> Mumbai Weather: मुंबई-ठाण्यात बरसणार पावसाच्या सरी, पाहा लोकल ट्रेनचं अपडेट
ऐश्वर्या आणि आदित्य हुलावळे यांचं लग्न 2017-18 मध्ये झालं होतं. मात्र, अवघ्या दहा महिन्यांतच त्यांचा संसार मोडकळीस आला. ऐश्वर्याने सांगितलं की, पती आदित्य यांचे गैरप्रकार तिला समजल्यानंतर त्यांच्याकडून तिचा सतत छळ होत होता. सासरच्या मंडळींकडूनही तिला मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. याबाबत तक्रार करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली, पण तिथंही तिला न्याय मिळाला नाही. उलट, तिला सासरी परत पाठवण्यात आलं. शेवटी, त्रास असह्य झाल्यानं ऐश्वर्याने सासर सोडलं आणि ती गेल्या सात वर्षांपासून माहेरीच राहत आहे. ऐश्वर्याला लग्नात 15 तोळे सोन्याचे दागिने, स्कोडा गाडी, चांदीची भांडी दिले होते. त्यानंतरही वारंवार पैशाचा तगादा लावला जात होता.
वैष्णवीसोबतही असाच प्रकार झाला होता...
वैष्णवीच्या मृत्यूनंतर (16 मे 2025) तिच्या शरीरावर आढळलेल्या मारहाणीच्या खुणा आणि शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलाशांनी हत्येचा संशय बळावला आहे. तिच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिश्मा यांना अटक झाली असून, राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
ऐश्वर्या काय म्हणाली?
हे ही वाचा >> निराधार योजनेसाठी पत्नीने मृत दाखवलं, तो पती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात...जालन्याचं प्रकरण काय?
ऐश्वर्याच्या प्रकरणातही असाच छळ आणि अन्यायाचा मुद्दा समोर येत आहे. तिने सांगितले की, सासरच्या मंडळींनी तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही तिला न्याय मिळाला नाही. वैष्णवीच्या प्रकरणाने समाजात निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेमुळे ऐश्वर्याला आता आपल्या लढ्याला बळ मिळेल असं दिसतंय. "वैष्णवीच्या प्रकरणामुळे मला माझ्या हक्कांसाठी लढण्याची ताकद दिली आहे. मला आणि माझ्यासारख्या इतर महिलांना न्याय मिळालाच पाहिजे." असं ऐश्वर्या म्हणाली आहे.