हनिमून हत्याकांड: वडिलांचा मोठा खुलासा, 'लग्नानंतरही सोनम आणि राजामध्ये नव्हते संबंध...'
हनीमूनसाठी पत्नीसह शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. राजा रघुवंशीच्या वडिलांनी आता आणखी एक आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

Raja and Sonam: इंदूर: राजा रघुवंशी याच्या हत्येबाबत आता नवनवीन गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता राजा रघुवंशीच्या वडिलांनी राजा आणि सोनमच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आता असा दावा केला आहे की, सोनमच्या संपूर्ण कुटुंबाला माहित होते की, तिचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधामुळे त्यांच्या घरात दररोज भांडणं व्हायची. शेजारच्या लोकांनाही त्यांच्या कुटुंबात भांडणं आणि वाद सुरू असल्याचं समजत होतं.
लग्नानंतरही सोनमचे पतीसोबत संबंध नव्हते
राजाच्या वडिलांनी सांगितले की, 'लग्नानंतरही सोनमचा माझ्या मुलाशी संबंध नव्हता. माझा मुलगा त्याच्या आईला सांगायचा की, ती माझ्याशी असं वागतेय जणू मी तिला पळवून आणलं आहे. आम्ही आमच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. आताही राजाचा संपूर्ण खोली सजवलेली आहे, राजा म्हणत होता की, लग्नानंतरही ती त्याच्याशी बोलायला तयार नाही. मला तिच्यासोबत लग्न केल्याचा पश्चात्ताप होत आहे.'
हे ही वाचा>> सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...
राजाचे वडील पुढे म्हणाले की, 'माझ्या मुलाच्या हत्येत जो कोणी सहभागी असेल त्याला सर्वांना फाशी द्यावी. या प्रकरणात आणखी लोक पुढे येतील. सोनमच्या वडिलांच्या कारखान्यातील लोकांनाही पकडले जाईल. मी रघुवंशी समाजाला संपूर्ण कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्याची विनंती करेन. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. ज्यांनी माझ्या मुलाला मारले आणि या हत्येत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना फाशी द्यावी.'
सोनमने सासूशी बोलली होती खोटं
राजासोबत हनिमून साजरा करण्यासाठी गेलेल्या सोनमने तिच्या सासूला फोनवर सांगितले होते की ती एकादशीचे व्रत करत आहे. परंतु तिने आणि चारही खुनींनी हॉटेलमध्ये पोटभर जेवण केले होते.
हे ही वाचा>> 'ऑपरेशन हनीमून'अंतर्गत पोलिसांनी उघडली अनेक गुपितं, सोनमची अख्खी कुंडलीच काढली
सोनमच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, तिच्या संपूर्ण कुटुंबाला माहित होते की सोनमचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहे, यावरून आई आणि मुलीमध्ये भांडण झाले होते, सोनम तिच्या आईला शिवीगाळ करत होती आणि ओरडत होती. शेजाऱ्यांनी सांगितले की लग्नाच्या तीन दिवस आधी भांडण झाले होते.
राज कुशवाह मास्टरमाइंड, सोनमनेच सांगतिलेले राजाला मारून टाका
सूत्रांनुसार, सोनमच्या लग्नाच्या दिवशी राज कुशवाह खूप रडला आणि त्यानंतर राजच्या मित्रांनी राजा रघुवंशीला मारण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशीच प्रियकर राज याने सोनमला पती राजाला शिलाँगला आणण्यास सांगितले होते. ते त्याला तिथे मारतील. लग्नानंतर सोनमने राजाला सांगितले होते की, 'जोपर्यंत आपण कामाख्याला भेट देत नाही तोपर्यंत आपण दूर राहू.'
दरम्यान, आता असाही दावा करण्यात येत आहे की, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट किलर्स राजाला मारत होते तेव्हा सोनम म्हणाली होती - त्याला ठार मारून टाका.