'राजा'सारखंच वीरूला संपवलं... लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच उशीने तोंड दाबून...

मुंबई तक

राजा हत्याकांडाप्रमाणेच अनीताने काशीच्या मदतीने वीरूचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी तीने रात्री वीरूला शिकंजीमध्ये झोपेची गोळी मिसळून दिली आणि घराचं दार उघडं ठेवलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी प्रकरणासारखंच प्रकरण

point

अनिताने वीरूला कसं संपवलं

Crime News : इंदोरच्या नवविवाहित महिलेनं हनिमूनला घेऊन जात नवऱ्याला संपवल्याच्या घटनेनं देश हादरला होता. गेले अनेक दिवस त्या प्रकरणात नाट्यमयरित्या वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. मात्र, आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच ही घटना आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ही घटना घडली. 8 जूनच्या रात्री खेड़ली बायपासवर वीरू जाटव या तरुणाचा मृतदेह त्याच्या घरी आढळला. पोलिसांनी या प्रकरणात वीरूची पत्नी अनीता, तिचा प्रियकर काशी आणि आणखी एका तरुणाला अटक केली आहे. 

हे ही वाचा >> "धर्मांतरासाठी आलेल्यांचा सैराट करा....", बक्षीस जाहीर करत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, अनीताने तिच्या प्रियकरासह वीरूची हत्या घडवून आणली. पती वीरूला तिच्या प्रियकराबद्दल माहिती मिळाल्याचं कळताच तिने हे कृ्त्य केलं. 

150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

वीरूचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या भावाने अनीतावर हत्येचा आरोप केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यात 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. तपासातून पोलिसांना कळले की, अनीताने तिच्या प्रियकर काशीसह वीरूची हत्या करण्याची योजना आखली होती. काशीने आपल्या चार मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी देऊन वीरूची हत्या घडवली. 8 जूनच्या रात्री काशी आपल्या मित्रांसह वीरूच्या घरी पोहोचला आणि तिथे त्यांनी उशीने वीरूचं तोंड दाबून त्याची हत्या केली. यावेळी गोंधळ झाल्यानं वीरूचा मुलगा जागा झाला, पण अनीताने त्याला धमकावून दुसऱ्या खोलीत पाठवलं आणि गप्प राहण्यास सांगितलं.

शिकंजीमध्येच दिली झोपेची गोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरूच्या दोन पत्नी होत्या आणि त्या दोघी वेगवेगळ्या घरात राहत होत्या. अनीता ही वीरूची दुसरी पत्नी होती. अनीता आणि वीरूच्या प्रेमविवाहानंतर ते एकत्र राहत होते. अनीताचंही वीरूसोबत दुसरं लग्न होती. दरम्यान, अनीताची काशीशी ओळख झाली. काशी हा तरूण तिच्या दुकानात सामान खरेदीला यायचा. त्यांची मैत्री वाढली आणि त्यांच्यात अवैध संबंध निर्माण झाले. वर्षभरापूर्वी वीरूला याची माहिती मिळाली. यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होत होती.

हे ही वाचा >>महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

राजा हत्याकांडाप्रमाणेच अनीताने काशीच्या मदतीने वीरूचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी तीने रात्री वीरूला शिकंजीमध्ये झोपेची गोळी मिसळून दिली आणि घराचं दार उघडं ठेवलं. रात्री दोनच्या सुमारास काशी आपल्या चार साथीदारांसह घरी पोहोचला आणि हत्या केली. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले. 
हत्या झाल्यानंतर दोन तासांनी अनीताने वीरूच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूची माहिती दिली. ती नाटक करत होती, जेणेकरून कोणाला तिच्यावर संशय येऊ नये.

अनीताने लगेचच तिच्या प्रियकर काशीला बोलावलं.  कुणालाही संशय येऊ नये म्हणून काशी वीरूला रुग्णालयात दाखल करताना आणि अंत्यसंस्कारासह सगळ्या प्रक्रियेत अनीतासोबत होता. मात्र, पोलीस तपास आणि नातेवाईकांच्या चौकशीतून हा खटला उघडकीस आला. पोलिसांनी अनीता, काशी आणि त्याचा साथीदार बृजेश यांना अटक केली. या प्रकरणात सहा जण सामील असून, तिघांना अटक झाली आहे. बाकी फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर रील बनवण्याचा छंद

तपासात समोर आलं की, अनीताला सोशल मीडियावर रील बनवण्याचा छंद होता. ती वीरूसोबत डान्सचे रील बनवायची. या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खेरी पोलिस स्टेशनचे अधिकारी वीरेंद्र सिंह गुर्जर यांनी सांगितलं की, तपासात सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून हा गुन्हा उघडकीस आला. फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


हे वाचलं का?

    follow whatsapp