“होय, मी श्रद्धाची हत्या केली”; पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबने कबूल केला गुन्हा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब याने पॉलिग्राफी चाचणीतही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबने पॉलीग्राफी चाचणीत आपणच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र आफताबला श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही. आफताबची पॉलीग्राफ चाचणी करणाऱ्या फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. आफताबने अनेक मुलींशी संबंध असल्याची कबुलीही दिली आहे. एवढेच नाही तर, पॉलीग्राफी चाचणीदरम्यान त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकल्याचेही मान्य केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलीग्राफी चाचणीदरम्यान आफताबचे वर्तन अगदी सामान्य होते. आफताबने सांगितले की, त्याने पोलिसांना सर्व काही सांगितले आहे. आता तज्ज्ञ आफताबच्या पॉलिग्राफी चाचणीचा अंतिम अहवाल तयार करत आहेत. हा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. या अहवालामुळे पोलिसांना तपासात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

1 डिसेंबरला होणार नार्को

आफताबची 1 डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. नार्को चाचणीपूर्वी आफताबची प्री-मेडिकल चाचणी घेण्यात आली होती. या पूर्व वैद्यकीय चाचण्या फक्त एफएसएल लॅबमध्ये केल्या गेल्या. त्याचा अहवाल आज येणार आहे. आंबेडकर रुग्णालयात आफताबची नार्को चाचणी होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आफताबने मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

आफताबवर 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा ही आफताबची मैत्रीण होती. दोघेही मुंबईचे रहिवासी होते. इकडे वसईत दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नंतर दोघांनी दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही 8 मे पासून दिल्लीतील मेहरौली येथे लिव्ह इन फ्लॅटमध्ये राहत होते. 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये भांडण झाले होते. यानंतर आफताबने त्याची हत्या केली. यानंतर आफताबने मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. तो रोज रात्री मेहरौलीच्या जंगलात मृतदेहाचा तुकडा टाकण्यासाठी जात असे. पोलिसांनी 12 नोव्हेंबरला आफताबला अटक केली होती.

श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचे होते

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचे होते. यामुळे आफताबला राग आला आणि त्याने निर्दयीपणे श्रद्धाची हत्या केली. आफताबच्या वागण्याला आणि मारहाणीला श्रद्धा कंटाळली होती. अशा परिस्थितीत त्यांनी आफताबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. 3-4 मे रोजी श्रद्धाने वेगळे होण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र आफताबला हे पटले नाही आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. मात्र, याआधी आफताबने चौकशीदरम्यान सांगितले होते की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती, या प्रकरणात त्याने श्रद्धाची हत्या केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT