Lok Sabha Election 2024: "असं होतं का?", उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांचा संतप्त सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांचा संतप्त सवाल
उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांचा संतप्त सवाल
social share
google news

Vishwajeet Kadam On Uddhav Thackeray : काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेली सांगलीची जागा मिळवण्यात उद्धव ठाकरेंनी बाजी मारली. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारीही घोषित करून टाकली. ठाकरेंनी झटपट घेतलेल्या या निर्णयावर विश्वजित कदम यांनी संताप व्यक्त केला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. 

विश्वजित कदम यांच्या भाषणातील मुद्दे

"ज्यावेळी ही चर्चा झाली, त्यावेळी दोन्ही मित्रपक्षांचे उघडपणे असं ठरलं होतं की, ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील, ते जो पक्ष निवडतील, त्या पक्षाला ही जागा देण्यात यावी. मग वरिष्ठ पातळीवर असं ठरलं होतं, तर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे?", असा सवाल विश्वजित कदमांनी केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम' ?

"हातकणंगलेची जागा शिवसेनेची होती. ती त्यांनी घ्यावी, आम्ही म्हणालो, महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. शिवसेनेच्या नेत्यासोबत तुम्ही आमच्यासाठी लढतात. प्रत्येक मुद्दा घेऊन तुम्ही तिथे लढत होतात. राजू शेट्टींचं आणि त्यांचं काय बिनसलं आम्हालाही कळलं नाही", असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

"मग आले सांगलीवर... अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती... दोन काँग्रेसचे आमदार, एक शरद पवारांच्या गटाचे आमदार. आम्ही पोटतिडकीने सांगतोय की इथे संघटन काँग्रेसचं आहे. सहकारी संस्थामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत", असे राजकीय समीकरण कदमांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे सांगलीत आले अन् उमेदवारी जाहीर केली

"काय झालं. एक तरुण कुस्तीगीर कार्यकर्त्याच्या प्रवेश केला गेला. तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो. तुम्ही तो विषय मांडला. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे उद्धव साहेबांनी सांगलीत येऊन इथली उमेदवारी जाहीर करून टाकली. लोकशाहीत असं होतं का?", असा संतप्त सवाल विश्वजित कदमांनी केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत ठाकरे अडचणीत!

"किमान आम्हाला विचारायचं तरी... एकतर जागा देणंच चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे. झालं काय, तुम्ही दिली नाही. तुम्ही काही गेलं असं मी म्हणत नाही. पण, कोण काय करत होतं यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे. या जिल्ह्याच्या राजकारणात आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा, पतंगराव कदमांचा वारसा मिळाला", असे विश्वजित कदम म्हणाले.  

मित्रपक्षातील नेत्याला इशारा

"कधी म्हणतात की, मनासारखं होत नसेल, तर दृष्ट लागते. मला, आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली. विश्वजित कदम आणि काही नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली. परंतु मला आज एक सांगायचं आहे की, या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली, ती दृष्ट काढता सुद्धा येते. ती दृष्ट काढण्याची जबाबदारी यापुढे विश्वजित कदम एकटा घेईन", असा इशारा विश्वजित कदम यांनी मित्रपक्षातील नेत्याला दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT