अजितदादा नॉटरिचेबल भुजबळ नाराज, तटकरे-पवार भेटीच्या चर्चा; राष्ट्रवादीत काय सुरु?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न 2019 पासून सातत्याने महाराष्ट्रातील जनतेला पडत आला आहे. महाराष्ट्रातील निवडणुका संपत येत असतानाच आता राष्ट्रवादीत काय सुरु आहे असा प्रश्न विचारला जातोय. त्याला गेल्या काही दिवसांमधील घडामोडींचा आधार दिला जातो आहे. अजित पवारांचं नॉटरिचेबल असणं, भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त करणं आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या भेटीच्या चर्चा रंगणं, यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याच्या चर्चा आहेत. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरु आहे, हेच आपण  समजावून घेऊयात. (lok sabha election 2024 ajit pawar not reachable chhagan bhujbal angry sunil tatkare sharad pawar meeting discussed in political circles what is really going on in ncp congress)

बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. बारामतीमधून पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते. या वक्तव्याचा पवार गटाच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला.

हे ही वाचा>> PM Modi : पत्रकार परिषद घेत नाही कारण...; अखेर मोदींनी दिलं उत्तर

अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटलांवर नाराजी व्यक्त केलेली. चंद्रकांत पाटलांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं, त्याचबरोबर या वक्तव्यानंतर तुम्ही बारामतीमध्ये प्रचारासाठी येऊ नका असं देखील पाटलांना सांगितल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं. याच पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांनी पवारांबाबत सहानभुती देखील दाखवली होती. पवारांना या वयात सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी सभा घ्यायला लावू नये असं देखील दादा म्हणाले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं घडतंय काय?

आता अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवारांविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं. शिरुरची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसून आले नाहीत. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुका आहेत. या जागांच्या प्रचारासाठी महायुतीकडून ठिकठिकाणी प्रचारसभा घेण्यात आल्या. दिंडोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेला अजित पवारांनी दांडी मारली. 

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधानांनी एनडीएमधील नेत्यांना बोलावलं होतं. या भेटीमध्ये देखील अजित पवार हजर राहिले नाहीत. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल गेले होते. त्यातच प्रफुल पटेल यांनी मोदींना महाराजांचा जिरेटोप घातल्याने वेगळंच राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालं. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maharashtra Live : अनिल देशमुखांचं वक्तव्य खोटेपणाचा कळस- सुनील तटकरे

या घटनेनंतरही अजित पवारांनी कुठलंही ट्विट किंवा प्रतिक्रिया दिली नाही. पुढे मुंबईत देखील पंतप्रधानांची सभा आणि रोड शो पार पडला. या दोन्ही ठिकाणी अजित पवार उपस्थित नव्हते. घाटकोपरची घटना घडल्यानंतरही अजित पवारांनी साधं ट्विट देखील केलं नाही. त्यामुळे साहजिकच अजित पवार नेमके कुठे आहेत, ते नाराज आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या. 

ADVERTISEMENT

अजित पवार नाराज असल्यावर राज्याच्या राजकारणात अनेकदा भूकंप झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे त्यांचं नाराज होणं वेगळ्या राजकीय घडामोडींचे संकेत देत असल्यांचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकडे अजित पवार नॉटरिचेबल असताना ते आजारी असतील अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे देखील नव्या चर्चा सुरु झाल्या. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी पुढे येत अजित पवार घशाच्या संसर्गामुळे आजारी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्कच्या सभेत ते येतील असं देखील सांगितलं. 

अजित पवार नॉटरिचेबल असताना तिकडे भुजबळांची नाराजी लपून राहिली नाही. घाटकोपर दुर्घटनेनंतर भाजपा उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना भुजबळांनी मात्र ठाकरेंची बाजू घेतली. केवळ ठाकरेंची बाजू घेतली नाही तर स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला. दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानभुती असल्याचं देखील भुजबळ यांनी मान्य केलं. 

राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करताच त्याला देखील भुजबळांनी लगेच प्रतिउत्तर दिलं. या सगळ्यामध्ये भाजप 400 जागा जिंकणं अवघड असल्याचं देखील त्यांनी एका मुलाखतीत मान्य केलं. नाशिकची जागा भुजबळांना अमित शाह यांनी लढवण्यास सांगितल्यानंतरही उशिरापर्यंत निर्णय न झाल्यामुळे भुजबळ नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न बावनकुळे, महाजन या भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आले. 

हे सगळं सुरु असाताना अचानक सुनील तटकरे आणि शरद पवार भेटल्याच्या चर्चा सुरु झाल्या. शरद पवार नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे तटकरे आले. तटकरेंनी पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्याचं अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं. 

त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीकडून होणाऱ्या प्रचारसभांमध्येही त्यांची उपस्थिती नसते. या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. 

'अनिल देशमुख यांनी वक्तव्य केलं की, 4 जूननंतर राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही असा प्रश्न विचारला असता यावर भुजबळ म्हणाले, 'त्यांना म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा आमच्याकडेच लोक यायला मागतायेत त्यामुळे इकडून कोणी जाण्याचा प्रश्न येत नाही.' 

भुजबळ साहेबांची नाराजी नाही आहे असं तुम्ही म्हणता मात्र एक ते दीड तास तुम्ही त्यांच्याशी चर्चा करता ही चर्चा नेमकी काय होती? असा प्रश्न महाजनांना विचारला असता ते म्हणाले, 'चर्चा अशी काही विशेष नाही. जिल्ह्यातले काही लोक आहेत, प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो. काही सूचना देत होतो. तसंच अनिल देशमुखांनी तटकरेंची चिंता करू नये. कोण कुठे जातंय हे तुम्हाला 4 जूननंतर कळेल. ' असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरु आहे याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. आता अजित पवार स्वतः समोर येत या सगळ्यावर काही खुलासा करतात की पुन्हा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT