"...मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही?", आव्हाडांचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही, माज कसला दाखवता?- जितेंद्र आव्हाड 

point

'संपवून टाका, कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका', अजित पवारांसह शिंदेवर टीकास्त्र 

point

'भाजपाला संविधानच मान्य नाही' 

Jitendra Awahd Ajit Pawar Maharashtra Lok Sabha election : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या रणधुमाळीत महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यातील 24 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. उद्या (13 मे) चौथ्या टप्पातील मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत उरलेल्या 24 मतदारसंघात प्रचाराल वेग आला आहे. राजकीय वर्तुळात पक्षावरील टीका, एकमेकांना पाडण्याची भाषा अनेकदा केली जाते. नुकतेच अजित पवारही प्रत्येक विरोधी उमेदवाराला पाडू असं म्हणाले. यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. (lok sabha slection 2024 jitendra awhad criticizes ajit pawar in thane rajan vichare campaign rally)

मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही, माज कसला दाखवता?- जितेंद्र आव्हाड 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही मेलो तरी, रक्ताचे पाट वाहिले तरीही या देशाचे संविधान बदलू देणार नाही, या देशाची लोकशाही बदलू देणार नाही. ठाण्यात ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दारी आहे. माझी निष्ठा तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. मी एकटाच तलवार घेऊन लढत असतो. मजा येते लढायला आणि समोर दिग्गज अजिदादांसारखा असले तर अजून लढायला आवडतं.

हेही वाचा: Lok Sabha Election BJP : 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ते आता ढोस देत सुटलेत. तुला पाडेन, तुला पाडेन. मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही. लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

'संपवून टाका, कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका', अजित पवारांसह शिंदेवर टीकास्त्र 

"1991 साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवले. त्यानंतर सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवले, 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पक्ष ताब्यात घेतला असा आरोप त्यांनी केला. 

ADVERTISEMENT

हेही वाचा:  'शिंदेंची अखेरची फडफड'; राऊत फडणवीसांना म्हणाले, 'कच्चे मडके'

त्याशिवाय दुसरीकडे ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, ज्या मातोश्रीने भरभरून दिले त्यांनी मातोश्री फोडण्याचं काम केले. या दोन्ही गद्दारी महाराष्ट्राला कधी आवडणार नाही. राज्यात २ गद्दारी ओळखली जाते, शिवाजी महाराजांच्या काळातला खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ, यांच्या औलादींना महाराष्ट्राने कधी ओळख दिली नाही, मोठेपणा दिला नाही. तसेच या नवीन सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंना या निवडणुकीत कायमचे संपवून टाका, येणाऱ्या कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका," असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांसह एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले.

ADVERTISEMENT

हेही वाचा: अजित पवारांना धक्के, फडणवीसांनी विधानसभेसाठी टाकला डाव?

'भाजपाला संविधानच मान्य नाही' 

"आम्हाला संविधान टिकवायचे आहे, भाजपाला संविधानच मान्य नाही. नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी पत्रक वाटण्यात आलं, त्यात पुरोगामी शब्दच गायब करण्यात आला. अनेक खासदारांनी प्रश्न विचारला तेव्हा चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालं असं ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानातून भाजपाला वगळायचा होता. या देशात धर्मद्वेष इतका वाढीला लागलाय, पहिल्या २ टप्प्यात मतदान झाले, त्यानंतर नागपूरला ४ वाजेपर्यंत काही माणसं भेटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळसूत्राबाबत मोदींनी विधान केले. या देशाची संस्कृती माहिती नसलेला माणूस कसा बोलतो हे ज्वलंत उदाहरण होतं. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार झाले, तेव्हा विचार केला नाही. भाजपाला संविधान आणि संसदीय लोकशाही बदलायची आहे", असा आरोपही आव्हाडांनी सरकारवर केला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT