Lok Sabha Election BJP : 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी संविधान बदलणार नाही, असं प्रत्येक सभेमध्ये सांगत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अबकी बार चार सो पार'वरून भाजप खिंडीत

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

भाजपच्या घोषणेने विरोधकांच्या हाती आयते कोलीत

Lok Sabha Election 2024 : 'अब की बार चारसो पार, तिसरी बार मोदी सरकार'! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच भाजपनं ही घोषणा करून वातावरण तयार केलं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे घोषवाक्य घुमलं. इतकंच काय तर सुरुवातीच्या प्रचारसभांमध्य़े पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी 'अब की बार 400 पार'वर जोर दिला. विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देऊ पाहणाऱ्या या घोषणेचा जोर मात्र, पहिल्या टप्प्यानंतरच कमी होत गेला. आता क्वचितच ही घोषणा कानावर पडतेय... नेमकं असं काय झालंय की भाजपकडून ही घोषणा देणं टाळलं जातंय, अशी चर्चा जोरात सुरू झालीये. 'अब की बार चारसो पार'ची घोषणा भाजपवर बुमरँग झालीये का आणि त्यामागची कारणं काय, हेच समजून घेऊयात...

2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. सलग दहा वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर भाजपनं आता तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी झोकून दिलं आहे. 2019 पासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपनं नेहमी प्रमाणे यावेळी एक घोषणा दिली, ती म्हणजे 'अबकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार'!

हेही वाचा >> अजित पवारांना धक्के, फडणवीसांनी विधानसभेसाठी टाकला डाव?

भाजपच्या या घोषणेनं देशातील वातावरण ढवळून निघालं. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 'चार सो पार'चा नारा सगळीकडं घुमू लागला. पण, हळूहळू याच 'चारशे पार'मुळे भाजपची अडचण झाल्याचं दिसू लागलं. कारण याच घोषणेवर बोट ठेवत विरोधकांनी भाजपला घेरलं, तेही संविधान बदलाच्या मुद्द्यावरून. विरोधकांनी हा मुद्दा उचलला आणि तो गावखेड्यापर्यंत पोहोचवला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपला चारशे जागा संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत, हा मुद्दा लोकांवर बिंबवण्यात विरोधक यशस्वी होत असल्याचं दिसून आलं. कारण प्रचारात भाजपला सातत्यानं यावर खुलासे करावं लागत आहेत. 

पंतप्रधान मोदींपासून महायुतीचा प्रत्येक नेता संविधान बदलणार नाही, हे सांगत आहे. दुसरीकडे विरोधकांनी कोंडी पकडल्यानं आणि त्यामुळं विरोधी वातारण तयार होत असल्यानं भाजपनं ही घोषणा देणं बाजूला सारली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'बारामतीत सुनेत्रा पवार लीड घेणार', निकालाआधीच फडणवीसांचं मोठं भाकित

आता प्रश्न आहे तो 'चार सो पार'चा  बुमरँग झालंय का? तर हो. कारण हे खुद्द महायुतीचे नेतेच सांगत आहेत. या घोषणेबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काय म्हणाले?

ADVERTISEMENT

भुजबळ एका मुलाखतीत म्हणाले की, "कर्नाटकातील कुणीतरी भाजपचा खासदार आहे, तो एक वेळा बोलला की, 'हो, आम्ही संविधान बदलू. मोदीजी वारंवार सांगताहेत की संविधान इतकं मजबूत आहे की, खुद्द बाबासाहेब आंबेडकरही आता बदलू शकत नाही. पण, हा प्रचार लोकांमध्ये होत आहे. हे खरं आहे आणि याचा किती परिणाम लोकांमध्ये होत आहे. हे आता मतपेट्या उघडल्या जातील, तेव्हाच कळेल."

उदय सामंत काय म्हणाले?

असं बोलणारे एकटे भुजबळच नाहीये. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीही चार सो पारच्या घोषणेचा फटका बसत असल्याचे म्हटलं आहे. एका मुलाखतीत उदय सामंत म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही, परंतु नरेंद्र मोदी यांचं वलय अद्याप संपलेलं नाही. ४०० पारचा जो भाजपाचा नारा होता, त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे. काँग्रेसच्या या अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे."

हेही वाचा >> भाजपने राज ठाकरेंना का सोबत घेतले? मोदींनीच दिले उत्तर

भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्याचंही उत्तर असंच होतं. मोदीजी आता चारशे पारचा उल्लेख करत नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "घटना बदलण्याची हाकाटी केली जाते ना म्हणून ते टाळलं जातं आहे."

महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर 'अबकी बार चारशे पार'चा नारा बुमरँग झालाय, असंच दिसून येत आहे. 

भाजप खासदाराचं ते विधान नेमकं काय?

आता मुद्दा 'अबकी बार चार सो'चा नारा आणि संविधान बदलण्याची चर्चा कशी सुरू झाली याचा... तर याला कारणीभूत ठरलं भाजपच्या खासदारानं केलेलं विधान. भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी यासंदर्भात विधान केलं होतं. ते काय म्हणाले तेही पाहुयात... 

"मोदीजी म्हणाले की, आम्हाला यावेळी 400 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहेत. चारशे का? तर आपल्याकडे सध्या लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आपले बहुमत कमी आहे. आपल्याकडे राज्यातील सरकारांमध्येही पुरेसं बहुमत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएने चारशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राज्यसभेत बहुमत मिळवता येईल आणि दोन तृतीयांश राज्यात सत्ता येण्यास मदत होईल."

हेही वाचा >> "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

अनंत कुमार हेगडे यांच्या याच विधानावर बोट ठेवत देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीतील नेते भाजपला खिंडीत पकडताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपसह एनडीएतील नेत्यांना यावर सातत्यानं आम्ही असं करणार नाही, असं सांगावं लागत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT