Raj Thackeray: अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी स्वत: सांगितलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?
अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?
social share
google news

Raj Thackeray-Amit Shah Meeting: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (9 एप्रिल) मुंबईत पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. मात्र, याच बरोबर त्यांची काही दिवसांपूर्वी अमित शाहांसोबत जी भेट झाली त्यात नेमकं काय घडलं हे राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. (what exactly happened in amit shah  meeting raj thackeray himself told in padva melava lok sabha election 2024)

राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीचा नेमका किस्सा जसाच्या तसा... 

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही. 

काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. 

हे ही वाचा>> राज ठाकरेंचा 'हा' निर्णय मनसैनिकांना पडणार महागात?

माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका. 

ADVERTISEMENT

म्हणे 'ठाकरे' कधीच दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासचं माहित नसतो... स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय ?

ADVERTISEMENT

मी अमित शहांना भेटल्यानंतर... २०१९ च्या 'लाव रे तो व्हिडीओ' लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणुकीआधी मोदी पंतप्रधान नव्हते ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मी गुजरात पाहिलं आणि तिथल्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र अजूनही गुजरातच्या पुढे आहे. पण तेव्हा जे वातावरण उभं झालं होतं त्यात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी आश्वासक वाटत होते. म्हणून ते पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारा देशातील पहिला राजकीय नेता मीच होतो. त्याप्रमाणे देशानेही कौल दिला. 

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं... ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.

हे ही वाचा>> ''उद्धव सारखं मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी मोदींना...'', राज ठाकरे कडाडले!

क गोष्ट स्पष्टच सांगतो... एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.

जागा वाटप वैगरे या गोष्टी माझ्यासाठी अजिबात संयमाच्या नाहीत. मी अमित शाहांना भेटलो.. पण जागा वाटप वैगरे चर्चा झाल्या नाही.. शिंदे-फडणवीस हे सातत्याने एकत्र येण्यासाठी बोलत होते. त्यामुळे मी अमित शाहांची भेट घेतली.  त्यानंतर इकडे आमची तिघांची बैठक झाली.. नंतर चिन्ह वैगरेवर चर्चा झाली. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT