Lok Sabha 2024 : नामांतर होऊनही निवडणूक आयोग औरंगाबाद आणि उस्मानाबाद नाव का वापरतोय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे नाव का बदलले नाही?
औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे नाव कधी बदलणार?
social share
google news

Aurangabad lok Sabha, osmanabad lok sabha Rename news : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांचा उल्लेख औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असा करण्यात आला. आयोगाकडून मतदारसंघांचे नामांतर का करण्यात आले नाही, हेच समजून घेऊयात...

महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर केले. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिल्यानंतर दोन्ही जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर झाले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ असा न करता औरंगाबाद आणि उस्मानाबाद असा उल्लेख केलेला आहे. 

निवडणूक आयोग जुनेच नाव का वापरतोय?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर होऊनही जुनीच नावे आयोगाकडून वापरली जात आहे. याबद्दल आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे कधी वापरली जाणार, याबद्दलही आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती", भाजप-सेनेचे सोशलवर 'युद्ध' 

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत दोन्ही मतदारसंघांचे नाव कायम राहणार आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना या लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना औरंगाबाद लोकसभा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असाच उल्लेख करावा लागणार आहे.

2026 नंतर जनगणना होणार आहे. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना आणि नामांतर होणार आहे. म्हणजेच 2026 पर्यंत उस्मानाबाद व औरंगाबाद नाव मतदारसंघच राहणार आहे. 

ADVERTISEMENT

लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना कशी केली जाते?

प्रत्येक मतदारसंघात लोकसंख्या वाढते किंवा कमी होते. लोकसंख्येतील हा बदल लक्षात घेऊन मतदारसंघांची पुनर्रचना केली जाते. ही प्रक्रिया स्वायत्त असलेल्या पुनर्रचना आयोगामार्फत केली जाते. हा आयोग निवडणूक आयोगाच्या सहकार्याने काम करतो. 

ADVERTISEMENT

संविधानाच्या कलम ८२ नुसार प्रत्येक जनगणनेनंतर संसदेला मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू करावा लागतो. हा कायदा लागू झाल्यावर पुनर्रचना आयोगाची स्थापना केली जाते. लोकसंख्या, सामाजिक आरक्षण हेही यावेळी बघितले जाते.

हेही वाचा >> अकलूजच्या 'शिवरत्नवर' खलबतं! रामराजेंसह जयंत पाटलांची उपस्थिती; मोहिते पाटील काय डाव टाकणार? 

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही मतदारसंघात वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT