Haryana politics : भाजपने भाकरी फिरवली, पाच तासांत बदलला मुख्यमंत्री, कारण...

भागवत हिरेकर

Haryana political Crisis : हरयाणामध्ये जाट विभाजन झाले तरच भाजपला फायदा होईल, हे साधे गणित आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपला जाटांची मते मिळाली नव्हती.

ADVERTISEMENT

नायब सैनी यांना हरयाणाचे मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपची रणनीती काय आहे?
असं काय घडलं की लोकसभा निवडणुकीआधी भाजपला हरयणाचा मुख्यमंत्री बदलावा लागला?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हरयाणात राजकीय नेतृत्व बदलले

point

भाजपने मनोहर लाल खट्टर यांना केले बाजूला

point

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड

Haryana politics Nayab Singh Saini : हरयाणात फार पूर्वी जे व्हायला हवे होते ते 12 मार्च रोजी घडले! भाजपने जननायक जनता पार्टीचा पाठिंबा गमावला. पण, भाजपचं सरकार कायम राहणार आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप जर दुष्यंत चौटाला शिवाय आज बहुमत सिद्ध करू शकतो तर आधी का नाही केले? यापूर्वीही अपक्ष आमदार भाजपसोबत होते. 

दुसरे असे की, याच निमित्ताने भाजपने मनोहर लाल खट्टर यांच्यापासून सुटकाही करून घेतली आहे. सोमवारी द्वारका एक्सप्रेसवेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी खट्टर यांचे गुणगान गात होते, तेव्हा अनेक राजकीय विश्लेषकांना वाटले की काहीतरी वेगळे घडणार आहे. कारण पंतप्रधान मोदी जाहीरपणे अशी स्तुती करत नाही. 

आता मुद्दा असा आहे की, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला मुख्यमंत्री बदलून काय साध्य करायचं आहे. मात्र, नायब सैनी यांच्या नावाची घोषणा होताच आगामी निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल हे स्पष्ट झाले.

'जेजेपी'शी युती तोडण्याची गरज का होती?

हरयाणात जाट विभाजन झाले, तरच भाजपला फायदा होईल, हे सरळ समीकरण आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपला जाटांची मते मिळाली नव्हती. भाजपही जाटविरोधी मतांसाठी रणनीती आखत आहे. हरयाणात जाट काँग्रेससोबत आहेत. INLD सुद्धा काही मते घेऊ शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp