टीव्ही पत्रकारितेचं वास्तव दाखवणारा तमाशा ‘LIVE’

मुंबई तक

पत्रकारिता करणं खरंच सोपं नाहीये.. हो खरंच सोपं नाहीये पण गेल्या काही वर्षात एखाद्या निरर्थक बातमी किंवा घटनेचं चावून चोथा होईपर्यंत केलं जाणारं चित्रण न्यूजचॅनल्सवर होत असतं. मग त्या बातमीचा जीव जाईपर्यंत किस पाडला जातो. टीआरपीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन बातमीची अतिरंजकता दाखवणाऱ्या न्यूजचॅनल्सना कुठे थांबावं हेच कळत नसतं. हे सगळं सांगण्याची आवश्यकता कारण याच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पत्रकारिता करणं खरंच सोपं नाहीये.. हो खरंच सोपं नाहीये पण गेल्या काही वर्षात एखाद्या निरर्थक बातमी किंवा घटनेचं चावून चोथा होईपर्यंत केलं जाणारं चित्रण न्यूजचॅनल्सवर होत असतं. मग त्या बातमीचा जीव जाईपर्यंत किस पाडला जातो. टीआरपीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन बातमीची अतिरंजकता दाखवणाऱ्या न्यूजचॅनल्सना कुठे थांबावं हेच कळत नसतं. हे सगळं सांगण्याची आवश्यकता कारण याच अतिरंजीत मिडीयाचं तंतोतंत पटेल रूचेल असं चित्रण करणारा सिनेमा म्हणजे तमाशा लाईव्ह… तमाशा लाईव्ह आपले डोळे उघडतो आणि मिडीयात चालणाऱ्या या अघोरी बातमीदारीचं डोळ्यात अंजन घालणारं चित्रण घडवतो…

माणसाला माणसाची भीती वाटू लागली… या ओळीच आपल्याला या सिनेमाची ओळख करून देतो. शहरात एका मुलीच्या आत्महत्येची घटना घडते.. ही घटना घडते तेव्हा त्याचं फारसं कोणाला सोयरसुतक नसतं. पण एका न्यूजचॅनेलची रिपोर्टर याची बातमी करते आणि ही घटना प्रकाशझोतात येते… या घटनेचं ती रिपोर्टर इतकं बटबटीत चित्रण करते की खिजगणतीतही नसलेलं ते चँनेल टीआरपीच्या ट्रॅकवर सुसाट धावायला लागतं. प्रतिस्पर्धी चँनेल ज्याचा अँकरचा प्राईम टाईम शो जो नंबर १ असतो त्याचा टीआरपी मात्र घसरायला लागतो.. टीआरपीच्या या खेळात आता हा अँकरही या बातमीला घेऊन उतरतो. आणि सुरू होते कुरघोड्यांवर कुरघोडी करणाऱ्याची सुरवात.. एका चँनेलने या घटनेबद्दल एक ब्रेकींग घटना उतरवली की प्रतिस्पर्धी चँनेल त्या ब्रेकींगच्या वरताण दुसरी ब्रेकींग करणार आणि डोंबाऱ्याच्या खेळासारखं आपणच योग्य यापलीकडे या चँनेल्सना काहीच सुचत नाही..

मात्र या सगळ्यात ते पत्रकारीतेच्या मूल्यांना हरताळ फासतात.. घटनेचं गांभीर्य समजून न घेता अतिशय निरर्थक असं डोक्याला बधीर करणारं चित्रण सुरू राहतं आणि समाज केव्हा प्रेक्षक म्हणून आपण हा अतिरंजीत खेळ पाहत बसतो.. याचा शेवट असाच होतो का.. हे असंच सुरू राहतं का यासाठी तमाशा लाईव्ह एकदा तरी पाहायलाच हवा

तमाशा लाईव्ह हा सिनेमा एका लोकनाट्यासारखा सजवण्यात आलाय. ज्या लोकनाट्यात एक गण,गवळण,सूत्रधार आणि गाण्याच्या मार्फत सूत्रधार कथा पुढे घेऊन जात असतो.. तमाशा लाईव्हही तसाच आखण्यात आलाय.. दोन सूत्रधार ही कथा गाण्याच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहचवतात. आणि ती ही फारच रंजक पद्धतीने ही अतिशय हटके वाटणारी संकल्पना दिग्दर्शक संजय जाधवच्या आयडियाच्या कल्पनेतून आलीय.. संजय जाधव म्हणजे दुनियादारी ही एक ओळख बनलीय.. आणि ती चांगलीही आहे म्हणा पण आता संजय जाधव म्हणजे दुनियादारी आणि तमाशा लाईव्ह ही एक नवीन ओळख या सिनेमाने घडणार आहे. इतका सुंदर सिनेमा संजय जाधवने केलाय..

हे वाचलं का?

    follow whatsapp