बाळासाहेबांनी राजऐवजी उद्धव यांची का केली निवड?, ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा

मुंबई तक

Shiv Sena UBT: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर का सोपावली याचा संपूर्ण किस्सा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात सांगितला आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा (फाइल फोटो)
उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा (फाइल फोटो)
google news

बातम्या हायलाइट

point

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग

point

रतन टाटांची आठवण काढत उद्धव ठाकरेंनी सांगितला एक किस्सा

point

बाळासाहेबांनी आपली निवड का केली हेच सांगितलं उद्धव ठाकरेंनी

Uddhav Thackeray and Raj Thackeray: मुंबई: शिवसेनेत जेव्हा कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झालेली तेव्हापासूनच पक्षात धुसफूस झाली होती. अनेकांनी असाही सवाल केला होता की, बाळासाहेबांनी राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंची निवड का केली? आता देखील अनेकदा याबाबत सवाल विचार उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जातो. पण आज (12 ऑक्टोबर) अनेक वर्षांनी स्वत: उद्धव ठाकरेंनी या सगळ्याबाबतच एक किस्सा सांगत बाळासाहेबांनी केलेली निवड कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (shiv sena ubt dussehra melava why balasaheb thackeray chose uddhav instead of raj thackeray uddhav thackeray told the incident for first time)

बाळासाहेबांनी शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्यावर सोपवावी अशी चर्चा अनेकदा झाली होती. पण उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरे कुटुंबात कलह झाला आणि त्याची परिणिती म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र, असं असलं तरी बाळासाहेबांनी जी निवड केली ती योग्यच होती असं खुद्द रतन टाटा यांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरेंनी आज जाहीर मेळाव्यात सांगितलं.

हे ही वाचा>> CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींनो! CM शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा

'...त्यानंतरच बाळासाहेबांनी तुझी निवड केली', टाटांचा तो किस्सा अन् उद्धव ठाकरे बरंच काही गेले बोलून 

आपल्या भाषणात रतन टाटा यांची आठवण निघाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'टाटा साहेबांचीआठवण मुद्दाम सांगतो. शिवसेनाप्रमुख आपल्यातून गेल्यानंतर.. टाटा साहेब आमच्या घरी आले होते कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी. बराच वेळ बसले गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की, उद्धव एक लक्षात ठेव.. तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे.'

'तुला जसा शिवसेनाप्रमुखांचा वारसा लाभलाय तसा मला जेआरडी टाटांचा वारसा लाभलाय. जेआरडी यांच्यानंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्यांनी माझ्यावर हा संपूर्ण कारभार सोपवला.. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की, कोणताही निर्णय घेताना आज जेआरडी असते तर काय केलं असतं. त्यामुळे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो.'

हे वाचलं का?