मंदिराच्या रथयात्रेदरम्यान भीषण अपघात, विजेचा धक्का लागून 11 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

तंजावर (तमिळनाडू): तमिळनाडूतील तंजावर येथील कालीमेडू येथील एका मंदिरात विजेचा तीव्र झटका लागून तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक भाविक जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. कालीमेडू येथील मंदिरात 94 वा अप्पर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तंजावर (तमिळनाडू): तमिळनाडूतील तंजावर येथील कालीमेडू येथील एका मंदिरात विजेचा तीव्र झटका लागून तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक भाविक जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले होते.

कालीमेडू येथील मंदिरात 94 वा अप्पर गुरुपूजा उत्सव साजरा केला जात आहे, मंगळवारी रात्रीपासूनच येथे आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

यादरम्यान बुधवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली होती. देवाचा रथ ओढण्यासाठी शेकडो भाविकांमध्ये चढाओढ सुरू होती. यावेळी अचानक विजेचा प्रवाह सुरु असलेल्या तारेचा स्पर्श रथाला झाला आणि विजेचा तीव्र झटका लागून 2 मुलांसह 11 जणांचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून अनेक जण जखमी देखील झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहचलं आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp