अमरनाथमधे ढगफुटी, १५ भाविकांचा मृत्यू ४० जण बेपत्ता; मदत आणि बचावकार्य सुरू

मुंबई तक

जम्मू काश्मीरजवळच्या अमरनाथ या ठिकाणी शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यानंतर जो जलप्रलय आला त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. तसंच ४० जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथकं पोहचली आहेत. रात्रभर बचाव कार्य सुरू होतंच आता शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरू झालं आहे. #WATCH […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जम्मू काश्मीरजवळच्या अमरनाथ या ठिकाणी शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यानंतर जो जलप्रलय आला त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. तसंच ४० जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथकं पोहचली आहेत. रात्रभर बचाव कार्य सुरू होतंच आता शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरू झालं आहे.

ढगफुटीनंतर (Cloudburst in Amarnath) १५ जणांचा मृत्यू तर ३५ जण बेपत्ता

ढगफुटी झाली आणि त्यानंतर जो जलप्रलय झाला त्यामुळे या भागात असलेले तंबू वाहून गेले. ज्यामध्ये १५ भाविकांचा मृत्यू झाला. तर ३५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सातत्याने घेतला जातो आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयटीबीपी पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागात अद्यापही पाऊस पडतो आहेच. तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून जे भाविक त्या भागात नाहीत त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. अमरनाथ गुफा ज्या भागात आहे त्याच्या जवळचही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांना एअरलिफ्ट केलं जातं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp