भारत-चीन सैन्य पुन्हा आमने-सामने; अरुणाचल प्रदेशात 200 चिनी सैनिकांना रोखलं

मुंबई तक

मागील कित्येक महिन्यांपासून भारत-चीन यांच्या सीमेवरून तणाव निर्माण झालेला असून, गेल्या आठवड्यात चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत 200 चिनी सैनिक आले होते, त्यांना भारतीय जवानांनी रोखलं. कमांडर स्तरीय चर्चेनंतर वाद मिटल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशातील यांगत्से जवळ असलेल्या तवांग सेक्टरमध्ये मागील आठवड्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मागील कित्येक महिन्यांपासून भारत-चीन यांच्या सीमेवरून तणाव निर्माण झालेला असून, गेल्या आठवड्यात चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत 200 चिनी सैनिक आले होते, त्यांना भारतीय जवानांनी रोखलं. कमांडर स्तरीय चर्चेनंतर वाद मिटल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशातील यांगत्से जवळ असलेल्या तवांग सेक्टरमध्ये मागील आठवड्यात भारतीय जवानांनी चीन जवळपास 200 सैनिकांना रोखलं. दैनंदिन सीमेवर गस्त घातल असताना चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय भूप्रदेशात घुसले होते.

चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचंही वृत्त समोर आलं होतं. मात्र, संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारत-चीन सीमेचं अधिकृतपणे रेखाकंन करण्यात आलेलं नाही. दोन्ही देशांनी आपापल्या पद्धतीने सीमा निर्धारित केलेली आहे.

दोन्ही देश आपापल्या निश्चित केलेल्या धोरणानुसार गस्त घालतात. भारतीय हद्दीत आलेल्या चिनी सैनिकांना रोखल्यानंतर कमांडर स्तरीय चर्चा झाली. या बैठकीत ठरलेल्या प्रोटॉकॉल प्रमाणे चर्चा झाली आणि मुद्दा निकाली निघाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp