चार कारणं, ज्यामुळे अब्दुल सत्तार शिवसेनेची आमदारकी सोडायला तयार!
ठाकरेंनी चॅलेंज, तर ४० बंडखोरांना दिलं आहे. पण हे चॅलेंज केवळ एकानेच स्वीकारलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं आव्हान स्वीकारणारे आमदार आहेत अब्दुल सत्तार! अब्दुल सत्तारांनी आता ठाकरेंच्या आरेला कारे करण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारत ३१ तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आमदार सत्तार यांनी म्हटलं आहे. आव्हान स्वीकारतानाच […]
ADVERTISEMENT

ठाकरेंनी चॅलेंज, तर ४० बंडखोरांना दिलं आहे. पण हे चॅलेंज केवळ एकानेच स्वीकारलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं आव्हान स्वीकारणारे आमदार आहेत अब्दुल सत्तार! अब्दुल सत्तारांनी आता ठाकरेंच्या आरेला कारे करण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारत ३१ तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आमदार सत्तार यांनी म्हटलं आहे. आव्हान स्वीकारतानाच सत्तारांनी एक अटही टाकली आहे. अब्दुल सत्तारांच्या चॅलेंज स्वीकारण्यामागे काय आहे राजकारण?
बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा (शिव संवाद यात्रा आणि निष्ठा यात्रा) सुरू आहे. या दौऱ्यात बंडखोरांना हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आव्हान ठाकरेंकडून दिलं जातंय. शिवसेनेत बंड झाल्यावर बंडखोर पराभूत होतात, प्रभावहीन होतात, हा एक इतिहास राहिलाय. पण हाच इतिहास पुसण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आमदार अब्दुल सत्तारांनी.
ठाकरेंच्या आरेला कारे करताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘मी तर आता मुख्यमंत्री औरंगाबादला येतील तेव्हा राजीनामा देणार आहे. माझा निर्णय निश्चित झाला आहे. केवळ मुख्यमंत्र्यांची परवानगी हवी आहे. त्यावेळेस बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे, किस में कितना है दम देखते है, कोण गद्दार आहेत, हे लवकरच कळेल.’
अब्दुल सत्तारांच्या या भूमिकेमागची कारणं काय?
पहिलं कारण आहे. सिल्लोड मतदारसंघातलं राजकारण. कोणताही राजकीय वारसा नसलेले अब्दुल सत्तार गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. १९८४ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नगराध्यक्ष झाले. आणि गेल्या वीसेक वर्षांपासून सिल्लोड नगरपालिकेवर सत्तारांची एकहाती सत्ता आहे. चारवेळा आमदार झालेल्या सत्तारांचं मतदारसंघातल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही वर्चस्व आहे.