Nana Patekar : राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकारणात अनेक प्रकारची माणसं असतात. मात्र आपल्या कामावर प्रेम करून आपल्याला हेच खातं हवं असं म्हणत आमच्या भेटींमधला रस्त्यांचा दुवा साधणारे नितीन गडकरी आहेत. राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं ते उत्तम उदाहरण आहेत असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांची उपस्थिती होती. त्यावेळी नितीन गडकरींबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक केलं. खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं एक ठिकाण आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर गडकरींविषयी?

मी आज उशिरा आलो त्याचं कारण म्हणजे रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. गडकरींनी मला सांगितलं की नाना तुम्ही तिथे जा, ती खूप चांगली माणसं आहेत. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊन या. इथे थोडासा उशीर झाला तरीही चालेल. हे फक्त गडकरीच सांगू शकतात. रणजीत देशमुख हे काँग्रेस पक्षाचे आहेत तरीही गडकरींनी मला हे सांगितलं. राजकारणात अजातशत्रू कसं असलं पाहिजे ही गोष्ट नितीन गडकरींकडून शिकण्यासारखी आहे. मला पुढच्या वर्षी जर जमलं तर मी एखादा कार्यक्रम या ठिकाणी नक्की करेन असंही आश्वासन नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संगीत, नाटक, गाणं या सगळं आपल्या आयुष्यातून वगळलं तर आयुष्य कठीण होऊन जाईल. मला तुम्ही खूप मोठा सन्मान दिलात, मी काही फार मोठा नाही असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

मी सामान्य आहे. याचाच मला आनंद असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. मला मोठं व्हायचा नाही. मी होणारही नाही. माझी मोठं होण्याची पात्रताही नाही. जमिनीवर असल्यानंतर पडण्याची भिती नसते, उंचावर गेल्यावर पडण्याचा धोका असतो, तो धोका मला नसल्याचे पाटेकर म्हणाले. यावेळी पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंबांना मदत करण्याचंही आवाहन केलं. ही एक आपली जबाबदारी असल्याचे पाटेकर म्हणाले.

ADVERTISEMENT

यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर काय करता येईल याचा विचार करायला हवा असे पाटेकर यावेळी म्हणाले. सरकार त्यांच्या बाजूने जे करायचे ते करत राहिल. मात्र आपल्याला काय करता येईल हे पाहायला हवं असे ते म्हणाले. ऋतुचक्र खूप बदललं आहे. शेतकऱ्यांनी नेमकं कशाच्या आधारावर जगायचं हे कळत नाही असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT