‘मुंबईकरांचं ठरलंय म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय’; आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपचं उत्तर

मुंबई तक

आगामी महापालिका निवडणुकीत खरी चुरस शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातच असेल हे पुन्हा एकदा दिसून आलं. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच भाजपवर हल्ला चढवला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लागलीच पलटवार केला. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष बघायला मिळतोय. त्यातच बुधवारी शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आगामी महापालिका निवडणुकीत खरी चुरस शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातच असेल हे पुन्हा एकदा दिसून आलं. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच भाजपवर हल्ला चढवला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लागलीच पलटवार केला.

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष बघायला मिळतोय. त्यातच बुधवारी शिवसेना गतप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-शाहांना ललकारलं.

राज्यातील सत्तांतरापासून ते मुंबईत महापालिका निवडणुकीपर्यंत विविध मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसैनिक कसे वेळोवेळी मुंबईकरांसाठी धावून गेले. मुंबई आमच्यासाठी आईसमान आहे आदी उद्गार ठाकरेंनी काढले आणि भाजपला टोले लगावले.

उद्धव ठाकरेंचा ‘वार’, भाजपचा पलट’वार’

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झालाय. अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचले. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंना लक्ष्य केलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp