मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य
Crime News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीची निर्दयी बापाने हत्या केल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरण ऑनर किलिंकचे असल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या लग्नावरून कुटुंबात वारंवार वाद व्हायचा. याच वादाने पीडितेचा बाप थिम्मरायप्पाने लेकीची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात सातत्याने वाद
लग्नासाठी साड्या, मंगळसूत्र सर्वकाही खरेदी केलं, मात्र भयंकर घडलं
Crime News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीची निर्दयी बापाने हत्या केल्याचा संशय आहे. संबंधित प्रकरण ऑनर किलिंकचे असल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या लग्नावरून कुटुंहात वारंवार वाद व्हायचा. याच वादाने पीडितेचा बाप थिम्मरायप्पाने लेकीची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. हे प्रकरण कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. हत्येचा संशय असलेल्या मुलीची ओळख मेघना (वय 17) आहे.
हे ही वाचा : 'राजा शिवाजी'ने रचला इतिहास, अखेर सैराटचा मोडला रेकॉर्ड
नेमकं काय घडलं होतं?
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मेघना 16 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. तिची आई, निर्मला, सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता मजुरीच्या कामावरून घरी परतली होती. त्याचदरम्यान मुलगी तिथे नसल्याचे आढळून आले होते. जेव्हा त्यांनी मेघनाच्या मोबाईवरून फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो नंतर बंद झाला. संशय बळावल्याने त्यांनी मेघना बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात सातत्याने वाद
संबंधित प्रकरणात पोलिसांच्या माहितीनुसार, मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात सातत्याने वाद व्हायचा. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, मेघना ही पौढ म्हणजेच 18 वर्षांची झाल्यानंतर निर्मला आणि नातेवाईक तिच्या लग्नाचा विचार करत होते. तिचे नातेवाईकाशी विवाह लावावा असा त्यांनी तगादा लावला होता.
लग्नासाठी साड्या, मंगळसूत्र सर्वकाही खरेदी केलं, मात्र भयंकर घडलं
कुटुंबियांनी लग्नासाठी साड्या, मंगळसूत्र सर्वकाही खरेदी केलं होतं. मात्र, थिम्मरायप्पाचा आपल्या मुलीने पत्नीच्या नातेवाईकांशी लग्नाला विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरून चार-पाच महिन्यांपासून वाद सुरूच होता, असे सांगण्यात येते. याच वादाचा कंटाळून दुसऱ्याच दिवशी मेघना गायब झाली. नंतर स्वतः थिम्मरायप्पा देखील गायब झाल्याने भलताच संशय बळावला.









