उत्तराखंडमध्ये चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी, पुलाचंही केलं नुकसान?

मुंबई तक

लडाखच्या पूर्व भागात ताणाताणी झाल्यानंतर आता चीनने उत्तराखंडमध्ये नापाक कारवाई केली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार चिनी लष्कराचे 100 हून अधिक जवान सीमा ओलांडून भारतात घुसले. हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोती भागात गेले होते. रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे. या घुसखोरीनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागातून चिनी सैनिक परतले होते. तुन जुनला पास ओलांडून चीनचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लडाखच्या पूर्व भागात ताणाताणी झाल्यानंतर आता चीनने उत्तराखंडमध्ये नापाक कारवाई केली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार चिनी लष्कराचे 100 हून अधिक जवान सीमा ओलांडून भारतात घुसले. हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोती भागात गेले होते. रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे.

या घुसखोरीनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागातून चिनी सैनिक परतले होते. तुन जुनला पास ओलांडून चीनचे 100 पेक्षा जास्त सैनिक हे भारतात घुसले होते. पाच किमीपर्यंत आत येत त्यांनी ही घुसखोरी केली होती. अशीही माहिीत मिळाली आहे की एका पुलाचंही या सैनिकांनी नुकसान केलं. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्विट?

जुमला-घर में घुस के मारेंगे

हे वाचलं का?

    follow whatsapp