मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट... मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल! कधीपासून होणार लागू?

मुंबई तक

मध्य रेल्वेने काही मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वेच्या या निर्णयानुसार, काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट...

point

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!

point

कधीपासून नवं वेळापत्रक होणार लागू?

Mumbai News: मध्य रेल्वेने काही मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वेच्या या निर्णयानुसार, काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सुधारित वेळापत्रक 13 आणि 14 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. वाढत्या रेल्वे वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने या महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

'या' गाड्यांच्या वेळात बदल... 

मिळालेल्या माहितीनुसार, 22177 सीएसएमटी-बनारस महानगरी एक्सप्रेस आता सीएसएमटीहून 00:15 वाजता सुटेल आणि वाराणसीला 03:45 वाजता पोहोचेल. पूर्वी, ही ट्रेन 00:10 वाजता निघून 03:35 वाजता वाराणसीला पोहोचायची. 

ट्रेन क्रमांक 22178 बनारस-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस वाराणसीहून 09:45 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 11:40 वाजता पोहोचेल. पूर्वी, ही गाडी वाराणसीहून 10:00 वाजता निघायची. 

त्याचप्रमाणे, 12111 सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून रात्री 20:05 ऐवजी 20:50 वाजता सुटेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp